शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

कोरोनाकाळात बंद गाड्या सुरू करणार : रावसाहेब दानवे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2022 1:36 AM

मागील दोन वर्षांतील कोरोनाच्या काळात बंद झालेल्या सर्व रेल्वेगाड्या सुरू करणार असून, राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणेच रेल्वे सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देनागरिकांना वीज पुरविणे ही राज्य शासनाची जबाबदारी

नाशिक : मागील दोन वर्षांतील कोरोनाच्या काळात बंद झालेल्या सर्व रेल्वेगाड्या सुरू करणार असून, राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणेच रेल्वे सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना दिली. आपल्या खासगी कामानिमित्त काही वेळ नाशिक येथे थांबलेले रावसाहेब दानवे यांनी येथील विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. कोळशाबाबत राज्य वीज वितरण कंपनीने ज्यावेळी नियोजन करायला हवे होते त्यावेळी केले नाही. त्यामुळे राज्यात विजेचे संकट जाणवत आहे. केंद्र शासनाकडे यावर्षी मागील वर्षीपेक्षा जास्त कोळसा आहे. कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. राज्यातील नागरिकांना वीज पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून, केंद्राची जबाबदारी फक्त कोळसा पुरविण्याची असल्याचे त्यांनी राज्यातील वीज संकटाविषयी बोलताना सांगितले. बॉम्बस्फोटाच्या काळात स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी दाउदच्या विरोधात सर्वसामान्य जनतेची बाजू घेतली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दाउदशी संबंध असणाऱ्यांना पाठिंबा देत असल्याचा आरोपही त्यांनी नवाब मलिक प्रकरणावर बोलताना केला.

चौकट-

युक्रेनमधील भारतीयांची चिंता

युक्रेन अडकलेल्या भारतीयांची केंद्र शासनाला चिंता असून तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी शासनाच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. केंद्रातील चार मंत्री युक्रेन आणि रशियाच्या आजुबाजूच्या देशांमध्ये जाऊन भारतीयांना परत आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये, केंद्र शासन त्यांना मायदेशी आणेल, असा विश्वासही दानवे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

टॅग्स :Nashikनाशिकrailwayरेल्वेraosaheb danveरावसाहेब दानवे