शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

नाशिकमधील क्रांतिकारकांच्या घरांना मिळणार ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 1:35 AM

नाशिक : ब्रिटिशकाळात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरीत्या चळवळी करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची नाशिकमध्ये मोठी संख्या होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे मेरूमणी आणि प्रेरणास्रोत. काळाच्या ओघात असे क्रांतिकारक विस्मृतीत जाऊ लागले असले तरी ते जेथे राहात होते अशा ठिकाणी त्यांच्या नावांचे फलक लावून किमान त्यांची नावे नव्या पिढीला ज्ञात व्हावी, यासाठी त्यांच्या घरांना ओळख देण्याचा उपक्रम येथील अभिनव भारत मंदिर ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देफलक लावणार : ९ आॅगस्टपासून अभिनव भारत मंदिर ट्रस्ट करणार शुभारंभ; अन्य फलकही लवकरच

नाशिक : ब्रिटिशकाळात स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले प्रत्यक्ष आणि प्रत्यक्षरीत्या चळवळी करणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांची नाशिकमध्ये मोठी संख्या होती. स्वातंत्र्यवीर सावरकर हे त्यांचे मेरूमणी आणि प्रेरणास्रोत. काळाच्या ओघात असे क्रांतिकारक विस्मृतीत जाऊ लागले असले तरी ते जेथे राहात होते अशा ठिकाणी त्यांच्या नावांचे फलक लावून किमान त्यांची नावे नव्या पिढीला ज्ञात व्हावी, यासाठी त्यांच्या घरांना ओळख देण्याचा उपक्रम येथील अभिनव भारत मंदिर ट्रस्टच्या वतीने राबविण्यात येणार आहे.येत्या ९ आॅगस्टपासून म्हणजे क्रांती दिनाच्या दिवशी त्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ज्या वाड्यात भाड्याने वास्तव्यास होते अशा सध्याच्या तिवारी वाड्यापासून हा शुभारंभ करण्यात येणार आहे. ब्रिटिशांच्या विरोधातील लढ्यात नाशिक अग्रेसर होते.स्वातंत्र्यवीर सावरकरांची ही भूमी असल्याने त्यांच्या प्रेरणेने अनेक जण या चळवळीत येऊन क्रांतिकारक झाले. काहींची नावे ज्ञात असली तरी अनेकांची नावे विस्मृतीत गेली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेनेच कलेक्टर जॅक्सनचा वध विजयानंद थिएटरमध्ये २१ डिसेंबर १९०९ रोजी करण्यात आला. तिळभांडेश्वर लेनमधील वर्तकांच्या वाड्यात सावरकर भाड्याने राहात होते. हा वाडा तिवारी यांनी घेतला. परंतु त्यात बदल मात्र केले नाहीत. त्याच वाड्यावर असा फलक लावून शुभारंभ करण्यात येईल. अन्य क्रांतिकारकांच्या जन्मदिवशी किंवा पुण्यतिथीच्या दिवशी फलक लावण्यात येणार आहेत. - सूर्यकांत रहाळकर, अभिनव भारत मंदिर ट्रस्ट, नाशिकहुतात्मा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांचे नाव सर्वश्रुत असले तरी त्याचबरोबर कृष्णा गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे हेदेखील प्रामुख्याने सहभागी होते. अशा अनेक क्रांतिकारकांपैकी केवळ सावरकरांची प्रभावळ मानले जातील असे अनेक क्रांतिकारक होते. त्यातील ३३ जणांची माहिती अभिनव भारत मंदिर ट्रस्टकडे उपलब्ध आहे. नव्या पिढीला नाशिकचे क्रांतिकारक कोण होते आणि कोठे वास्तव्यास होते याची माहिती व्हावी यासाठी अशा क्रांतिकारकांच्या मूळ निवासस्थान असलेल्या वाड्यांवर किंवा आता इमारतीत रूपांतरित झालेल्या घरांवर फलक लावण्यात येणार आहे. आता तो वाडा पूर्णत: तिवारी यांच्या मालकीचा आहे.४अभिनव भारत मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार २७ क्रांतिकारकांच्या मूळ निवासस्थानावर ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निवासस्थान’ असा छोटा फलक लावण्यात येणार असून त्यासाठी जागामालकांची संमतीदेखील घेण्यात येणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक