शहरं
Join us  
Trending Stories
1
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
2
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
3
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
4
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
5
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
6
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
7
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
8
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
9
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
10
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
11
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
12
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
13
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
14
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
15
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
16
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
17
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
18
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
19
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
20
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?

वसुली घटूनही कर्जवाटपात आठशे कोटींनी वाढ

By admin | Published: August 06, 2016 12:38 AM

जिल्हा बॅँक : ४० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण

 नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी खरीप कर्ज वाटपात तब्बल ८९४ कोटी रुपयांची वाढ झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. इतकेच नव्हे, तर शासन निर्णयानुसार ३१ जुलै अखेर सुमारे सात हजार सभासदांच्या ४० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठण करण्यात आले आहे.विशेष म्हणजे लोखंडी तिजोरी खरेदी, सीसीटीव्ही खरेदी, नोकर भरतीसह अन्य कारणांनी बॅँकेची आर्थिक स्थिती काहीशी डळमळीत झालेली असताना आणि मागील वर्षाच्या दुष्काळामुळे कर्जवसुलीवर प्रतिकूल परिणाम झालेला असताना यावर्षी खरिपाच्या कर्ज वाटपात जिल्हा बॅँकेने सढळ हाताने कर्ज दिल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण यावर्षी पाऊस चांगला असल्याने शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांसह नगदी पिके काढण्याकडे कल वाढविला आहे. सन २०१५-१६ च्या खरीप हंगामात ३० जून २०१५ अखेर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने एक लाख ४२ हजार ३१८ सभासदांना ७८३ कोटी ४४ लाख ८० हजारांचे कर्ज वाटप केले होते. त्या तुलनेत यावर्षी दोन लाख २८ हजार ७९८ सभासदांना १६७७ कोटी ७९ लाख ९८ हजारांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी ८६ हजार ४८० जास्त सभासदांना ८९४ कोटी ३५ लाख १८ हजार जास्तीचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. बॅँकेने यंदा चांगला पाऊस झाल्याने खरिपासाठी चांगले कर्ज वाटप केले आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी हाच कर्ज वाटपाचा आकडा २२०० ते २३०० कोटींच्या घरात पोहोचला होता; मात्र आता कर्जाचा आलेख १६७७ कोटींपर्यंत खाली उतरला आहे. (प्रतिनिधी)