शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जीवनात धर्माचे अधिष्ठान आवश्यक : पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:35 IST

मानवी जन्म फार मोठ्या पुण्याईने मिळाला असून भौतिक सुखात न गुरफटता या जीवनाचे सार्थक करण्यासाठी धर्माचे अधिष्ठान आवश्यक असल्याचे प्रतिपादन वर्तमान गच्छाधिपती आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिक : मानवी जन्म फार मोठ्या पुण्याईने मिळाला असून भौतिक सुखात न गुरफटता या जीवनाचे सार्थक करण्यासाठी धर्माचे अधिष्ठान आवश्यक असल्याचे प्रतिपादन वर्तमान गच्छाधिपती आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. शुक्रवारी(दि.२१) सकाळी विविध कार्यक्र मांसाठी त्यांचे नाशिक शहरात आगमन झाले. त्यानंतर गंजमाळ येथून मिरवणुकीने मुनीजनांचे टिळकवाडी येथील भाविक आराधना भवन येथे आगमन झाले.या मिरवणुकीत जैन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर आराधना भवनात प्रवचनात आचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले की, जीवन क्षणभंगूर असून मोहमाया, सत्ता, संपत्ती- ऐश्वर्य यापेक्षा सत्य अहिंसा, त्याग, दया यांचा उपयोग केला तर जीवनात एक वेगळेच समाधान मिळते. तसेच आपले भविष्य उज्ज्वल बनते.सध्याची परिस्थिती अत्यंत भयानक असून, धर्माशिवाय पर्याय नाही,असे प्रतिपादन त्यांनी केले.आचार्य परमपूज्य पुण्य पालसुरीजी म.सा. यांच्याबरोबर परमपूज्य आचार्य भुवन भूषण विजय जी म. सा. आचार्य वज्रभूषण विजयजी म.सा., आचार्य भव्यभूषण विजयजी म.सा., मुनिराज मुक्तिभूषण विजयजी म.सा., मैत्रिभूषण विजयजी म.सा, मुनिराज तीर्थभूषण विजयजी म.सा., तसेच जैन साध्वी हंस कीर्ती श्रीजी म.सा., अनेक साधुसंत उपस्थित होते.दीक्षार्थी मोहमई संसाराचा त्याग करून २९ जण जैन धर्म शास्त्राप्रमाणे दीक्षा घेणार आहेत.त्यांची ही मिरवणूक काढण्यात आली. दीक्षा ग्रहण समारंभ मुहूर्ता प्रमाणे होईल. परमपूज्य आचार्य पुण्यपाल सुरीजी म. सा. यांच्या उपस्थितीत देवळालीगाव येथे उपदानतपाचा जानेवारी २०१९ पासून प्रारंभ होईल. सदर सोहळा यशस्वीसाठी प्रवीण शहा,महेश भाई शहा,शैलेश शहा,अनुज शहा, गौतम सुराणा,प्रकाश बोथरा,सीलकेश कोठारी, भुपेंद्र शहा, डॉ. विक्र म शहा, सुरेश शहा,जितूभाई शहा आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.ठिकठिकाणी स्वागताच्या उभारल्या कमानीपरमपूज्य आचार्य भगवंत पुण्यपाल सुरीश्वरजी म.सा. यांचा शिष्य परिवार सुमारे १४०० साधू-साध्वींचा असून त्यांची सुमारे ६० वर्षांपूवी दिंडोरी तालुक्यातील वणी येथे दीक्षा संपन्न झाली होती. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व जैन समाजातील बांधवता आनंदाचे वातावरण पसरले होते.सकाळी गंजमाळ येथील सुविधींनाथ जैन मंदिरापासून त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. ठिकठिकाणी स्वागताच्या कमानी उभारल्या होत्या. विविध आकर्षक देखावे रांगोळीने सर्व रस्ते धर्ममय झाले होते. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. नाशिकचा ढोल, लेजीम, आदिवासी नृत्य, तुतारी असे मिरवणुकीचे स्वरूप होते.

टॅग्स :Jain Tirthkshetraजैन तीर्थक्षेत्रNashikनाशिक