शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

खासगीकरणातून काढणार धरणातील रेती, गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:53 AM

आठवडाभरात निविदा : गिरणासह राज्यातील पाच धरणांचा समावेश

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यातील धरणांमध्ये गाळ व रेती साठल्यामुळे पाणी साठवण क्षमता कमी झाली आहे, नवीन धरणे बांधणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील पाच मोठ्या धरणांमधील गाळ व रेती काढण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून, त्यातून शेतकऱ्यांना सुपीक गाळ व सरकारला रेती उत्खननातून पैसा मिळणार असल्याची माहिती राज्याचे जलसंपदामंत्री तथा नाशिक जिल्ह्णाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. या पाच धरणांमध्ये नाशिक जिल्ह्णातील गिरणासह हातनूर, जायकवाडी, गोसीखुर्द व उजनीचा समावेश आहे.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना महाजन म्हणाले, राज्यातील धरणांची पाणी साठवणुकीची क्षमता वाढविण्यासाठी गाळ काढणे हाच एकमेव उपाय आहे. नवीन धरणे बांधण्यासाठी भूसंपादन, निधी, पर्यावरणाची हानी, जमीन मालकांचे पुनर्वसन असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. राज्यातील काही धरणांची कामे गेल्या चाळीस वर्षांत पूर्ण होऊ शकलेली नाहीत परिणामी पाण्याचा प्रश्न कायम राहिला तसेच त्यावरील खर्चही वाया गेला आहे. ते टाळण्यासाठी नवीन धरणे बांधण्यापेक्षा ज्या ज्या ठिकाणाहून नवीन धरणांची मागणी होईल त्या ठिकाणच्या धरणांमधील गाळ काढण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे. खासगीकरणातून धरणांमधील गाळ व रेती काढण्याबाबत जलसंपदा विभागाने प्रस्ताव तयार केला असून, त्यासाठी ठेका दिला जाईल. ठेकेदारांनी धरणामध्ये किती गाळ व रेती आहे. याचा अभ्यास करून त्यासाठी निविदा भरतील व धरणातील गाळ शेतकऱ्यांना मोफत दिला जाईल तर रेती विक्रीतून काही रक्कम ठेकेदार व काही रक्कम राज्य सरकारला मिळणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील गिरणा, उजनी, हातनूर, जायकवाडी, गोसीखुर्द या धरणांना प्राधान्य देण्यात आले आहे. येत्या आठवड्यात या संदर्भातील निविदा काढण्यात येईल, त्याला मिळणारा प्रतिसाद पाहूनच आगामी सहा महिन्यांत टप्पाटप्प्याने संपूर्ण राज्यातील धरणांमधील गाळ काढण्यासाठी याच पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. सध्या राज्य सरकारने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राबविल्यामुळे बऱ्याचशा प्रकल्पांमधून लोकसहभागातून गाळ काढला गेला आहे, त्याचा लाभ पाण्याच्या साठवण क्षमतेवर झाला असल्याची माहितीही जलसंपदामंत्री गिरीश बापट यांनी दिली. राज्यात सर्वाधिक गाळ नाशिक जिल्ह्णात काढला गेल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.