शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

ग्रामसभा न घेण्याचा ठराव

By admin | Published: January 30, 2015 12:50 AM

स्मशानभूमीचा प्रश्न न सुटल्याने निकवेलकर नाराज

निकवेल : निकवेल येथे जोपर्यंत स्मशानभूूमीच्या बांधकामाला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत येथे ग्रामसभा न घेण्याचा ठराव ग्रामस्थांनी प्रजासत्ताकदिनी झालेल्या ग्रामसभेमध्ये केल्याने प्रशासकीय कामामध्ये होत असलेली दिरंगाई यानिमित्ताने समोर आली.निकवेल ग्रामपंचायतमध्ये सरपंच उखूबाई मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा संपन्न झाली. यावेळी शासकीय परिपत्रकाचे वाचन ग्रामसेवक निकम यांनी केले. तसेच या परिपत्रकात विविध विषयांवर ग्रामसभेने मंजुरी दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी स्मशानभूमी का होत नाही? ती बऱ्याच वर्षांपासून मोडकळीस आलेली आहे. गेल्या महिन्यामध्ये गावामध्ये पाच ते सहा व्यक्तींचा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या अंत्यविधीसाठी जागेचा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे अंत्यविधी नदीकाठी कुठे तरी केला जातो. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी जोपर्यंत निकवेलमध्ये नवीन स्मशानभूमी होत नाही तोपर्यंत यापुढे ग्रामसभा घेऊच नये, असा ठरावच ग्रामसभेने केला. त्यामुळे पुढील विकासकामांना अनेक अडचणींचा सामना ग्रामपंचायतीला करावा लागणार आहे. निकवेल येथील स्मशानभूमी गेल्या कित्येक दिवसांपासून मोडकळीस आलेली आहे. त्यामुळे त्या स्मशानभूमीमध्ये कोणीच अंत्यसंस्कार करत नाही. शासनाने निकवेल ग्रामस्थांची समस्या लवकरात लवकर दूर करावी, अशी मागणी भिका वाघ, केवल सोनवणे, मन्साराम, पोपट म्हसदे, संजय वाघ, सुनील वाघ, चिंतामण वाघ आदि ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामसभेमध्ये गावातील स्वच्छतेसंदर्भातही ग्रामस्थांनी गाऱ्हाणी मांडली. त्यामध्ये गावामध्ये गटारी साफसफाई करणे आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच निर्मलग्राम, ज्यांच्या घरी शौचालय नाही अशा लाभार्थींना शौचालय बांधण्यात प्रोत्साहन करण्यात आले व अशा लाभार्थींना शासनाकडून बारा हजार रुपयांचे अनुदान देण्यात येईल, असे आवाहन यावेळी ग्रामसेवक निकम यांनी केले. (वार्ताहर)