शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "आईनं असं काही भाष्य केलेलं नाही, ते असं का बोलले..."; अजितदादांना श्रीनिवास पवारांचं प्रत्युत्तर
3
वरवंड परिसरामध्ये दोन एसटी बसचा अपघात भीषण; दोन जण ठार : तीनजण गंभीर जखमी
4
"माझ्या प्रामाणिकपणाचं असं फळ मिळालं..?"; आमदार श्रीनिवास वनगा धाय मोकलून रडले
5
उमेदवाराच्या माघारीने उद्धवसेनेवर नामुष्की; 'औरंगाबाद मध्य'साठी तत्काळ दुसरा उमेदवार घोषित
6
Shrinivas Vanga News उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटाचा आमदार आत्महत्या करण्याच्या विचारात; कुटुंबाचा दावा
7
Zeeshan Siddique : बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर सलमानला लागली नाही झोप, झिशान म्हणतात, "रोज रात्री मला फोन..."
8
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
9
आई सांगत होती, माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका, पण तरीही...; बारामतीत अजितदादांना अश्रू अनावर!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सांगलीत महायुतीला धक्का! भाजपा उमेदवाराविरोधात भरला अपक्ष अर्ज,माघार घेणार नसल्याचेही केले जाहीर
11
बोरिवलीच्या उमेदवारीवरून भाजपात नाराजी; माजी खासदार गोपाळ शेट्टी स्पष्टच बोलले
12
Priyanka Gandhi : "जेव्हा मदर तेरेसा माझ्या घरी आल्या..."; प्रियंका गांधींनी सांगितला 'तो' हृदयस्पर्शी क्षण
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून चौथी यादी जाहीर; काटोल विधानसभेतून सलील देशमुखांना उमेदवारी
14
शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार
15
उद्धवसेनेला मोठा धक्का;'औरंगाबाद-मध्य'च्या उमेदवाराची अचानक निवडणुकीतून माघार
16
भाजपाची २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; बोरिवलीतून विद्यमान आमदारांचा पत्ता कट
17
"जुन्नरमध्ये पुन्हा घड्याळ" राष्ट्रवादीच्या रॅलीत स्टार प्रचारक सयाजी शिंदेंचा उत्साह शिगेला
18
AUS vs IND : किंग कोहलीच्या फॉर्मवर माजी निवडकर्त्यानं मांडल रोखठोक मत
19
नात्याला काळीमा! ८ कोटी न दिल्याने बायकोने काढला नवऱ्याचा काटा; मर्सिडीजने उघड झालं रहस्य
20
वक्फ बोर्डासाठी आयोजित JPC च्या बैठकीत पुन्हा राडा; विरोधकांचा वॉक आऊट

मार्ग प्रगतीचा : तब्बल १२ हजार कोटींच्या राष्टÑीय महामार्ग प्रकल्पातील पहिला टप्पा सुरत ते नगर सागरमाला प्रकल्पातील महामार्ग जाणार नाशिकमधून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 1:08 AM

नाशिक : केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या वतीने १२ हजार कोटींच्या सागरमाला प्रकल्पातील ४२१ किलोमीटरचा राष्टÑीय महामार्गाचा पहिला टप्पा सुरत ते नगर असा निश्चित करण्यात आल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले.

नाशिक : केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या वतीने १२ हजार कोटींच्या सागरमाला प्रकल्पातील ४२१ किलोमीटरचा राष्टÑीय महामार्गाचा पहिला टप्पा सुरत ते नगर असा निश्चित करण्यात आल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. त्यासाठीच्या मार्गाचा आराखडा निश्चित करण्यात आला असून, भूसंपादन प्रक्रियेला लवकरच प्रारंभ करण्यात येणार आहे. या प्रकल्पातील काही भाग दिंडोरी तालुक्यासह ओझर, आडगाव येथील मुंबई -गोवा महामार्गावरून निफाड, पेठ, सिन्नर, सुरगाणा या तालुक्यांमधून जाणार आहे.केंद्र शासनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, भारत सरकारचा एक व्यूहात्मक पुढाकार आहे. त्याचा उद्देश समुद्री बंदरांचे आधुनिकीकरण करणे असा आहे. भारताच्या विकासामध्ये समुद्रीकिनाऱ्यांचे अधिकाधिक योगदान मिळवण्याच्या प्रयत्नांचा तो भाग आहे. त्याद्वारे सध्या अस्तित्वात असलेल्या समुद्री बंदरांचा जागतिक दर्जाच्या बंदरात विकास करण्यासह बंदरांचा,औद्योगिक क्षेत्राचा आणि त्यासाठी दोन टोकांना जोडणाºया महामार्गाचा एकात्मिक विकास करणे असा या प्रकल्पाचा उद्देश आहे. बंदरात आलेला माल वेगवेगळ्या महामार्गांनी सर्वदूर पाठवणे सहजसुलभ व्हावे, असादेखील या प्रकल्पाचा उद्देश आहे. त्यासाठी भारतातील १२ बंदरे व १२०८ बेटे विकसित करण्यास केंद्र शासनाने पूर्वीच परवानगी दिली असून, सर्व बंदरांना महामार्गाद्वारे जोडण्याच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. भारतमाला प्रकल्पांतर्गत २०२५ सालापर्यंत एकूण ३५ हजार किलोमीटर लांबीच्या महामार्गांचे बांधकाम करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्र मानंतरचा हा देशातला दुसरा सर्वात मोठा महामार्ग बांधकाम प्रकल्प आहे.या प्रकल्पासाठी ‘सागरमाला विकास कंपनी लिमिटेड’ या कंपनीची निर्मिती करण्यात आली असून, त्याअंतर्गतच या महाकाय प्रकल्पाची रुपरेषा आखून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हा सागरमाला महामार्ग सुरतहून निघाल्यावर नाशिक, नगर पुढे पुणे, सोलापूर जिल्ह्णातून आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडूत दक्षिणेकडील समुद्रतटाला जाऊन मिळणार आहे. या प्रस्तावित महामार्गामुळे सुरत-मुंबईदरम्यानची वाहतूक तसेच मुंबई-पुणेदरम्यानच्या अवजड मालवाहतुकीला काही प्रमाणात आळा घालणेदेखील शक्य होणार आहे.

टॅग्स :Nashikनाशिक