शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 00:34 IST

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ४२ ग्रामपंचायतींचा कारभार करताना त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची चांगलीच धावपळ होत आहे.

ठळक मुद्देसिन्नर: २२ ग्रामसेवक सहायक निवडणूक अधिकारी

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत २२ ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित ४२ ग्रामपंचायतींचा कारभार करताना त्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. या दुहेरी जबाबदारीमुळे ग्रामसेवकांची चांगलीच धावपळ होत आहे.निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सहायक निवडणूक अधिकारी असलेल्या २२ ग्रामसेवकांच्या ४२ ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच इच्छुक उमेदवारांना निवडणूक लढविण्यासाठी दाखले लागत आहेत. त्यांचीही अडचण निर्माण झाली आहे.नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका सिन्नर तालुक्यात होत आहेत. ग्रामसेवकांना सहायक निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आल्याने इच्छुक उमेदवारांना दाखले देणे, घरपट्टी, पाणीपट्टीसह इतर करांच्या पावत्या वितरित करण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये थांबावे की, अर्ज स्वीकारण्यासाठीची जबाबदारी पार पाडावी, असा पेच संबंधित ग्रामसेवकांसमोर निर्माण झाला आहे.                          अर्ज दाखल करण्यासाठी मर्यादित कालावधी असल्याने आधीच पॅनलचे स्थानिक नेते, इच्छुक उमेदवार व त्यांच्या पाठिराख्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. ग्रामसेवक संघटनेने संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पर्यायी कर्मचा-यांची नेमणूक करण्याची मागणी केली आहे. कारण निवडणूक कार्यक्रम २१ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

                     इच्छुक उमेदवारांना चार-पाच दिवसात दाखले देणे व त्यानंतर या गावांतील अन्य नागरिकांना सोयी-सुविधा पुरविणे, त्यांनाही आवश्यक दाखले देणे अशी कामेही होऊ शकतील. याबाबतीत तहसीलदार काय निर्णय घेतात, याकडे ग्रामसेवकांचे लक्ष लागलेले आहे. नागरिकांचे हित लक्षात घेऊन संबंधित ग्रामपंचायतींवर पर्यायी कर्मचारी उपलब्ध करून द्यावा या मागणीने जोर धरला आहे.शासनाने घ्यावी दखलनिवडणूक विभागाने संबंधित ग्रामपंचायतींमध्ये पर्यायी कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्यास नागरिकांची अडचण होणार नाही. इच्छुक उमेदवारांची गैरसोय होणार नाही आणि त्या ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांची धावपळ थांबेल, अशी आमची भूमिका असल्याचे ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. संबंधित गावांमध्येही निवडणुका असल्या तरी अन्य नागरिकांनादेखील विविध कामांसाठी दाखले, उतारे लागत असतात. त्यांची प्रशासनाने दखल घ्यावी आणि निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक