शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

पिकांच्या काढणीची लगीनघाई, खरड छाटणीला मजुरांचा पत्ताच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 01:04 IST

शिरवाडे वणी : येथील परिसरात द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पुढील हंगामातील द्राक्षाचे पीक घेण्यासाठी खरड छाटणीला प्रारंभ झाला आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना गहू, हरभरा, कांदे या पिकांच्या काढणीच्या लगीनघाईमुळे मजुरांची तीव्र टंचाई भासत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर नवी डोकेदुखी उभी राहिली आहे.

ठळक मुद्देशिरवाडे वणी परिसरात द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात

शिरवाडे वणी : येथील परिसरात द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, पुढील हंगामातील द्राक्षाचे पीक घेण्यासाठी खरड छाटणीला प्रारंभ झाला आहे. द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात असताना गहू, हरभरा, कांदे या पिकांच्या काढणीच्या लगीनघाईमुळे मजुरांची तीव्र टंचाई भासत आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांसमोर नवी डोकेदुखी उभी राहिली आहे.गेल्या वर्षभरापासून जगभरात कोरोना रोगाने मात केली असून, त्याचा परिणाम शेतकरी वर्गापासून व्यावसायिक, व्यापारीवर्ग, मजूरवर्ग व इतर सर्वच उद्योगधंद्यांवर झाला आहे. परंतु, त्याच्या यातना बहुतांशी शेतकरीवर्गाला मोठ्या प्रमाणावर भोगाव्या लागल्या आहेत. द्राक्षे हे प्रमुख नगदी पीक जरी असले तरी पहिल्या टप्प्यातील द्राक्षाला सरासरी योग्य भाव मिळाला असून, दुसऱ्या व अंतिम टप्प्यातील कांदे व द्राक्षे मातीमोल भावाने विक्री करण्याची वेळ आल्यामुळे शेती व्यवसाय आता तरी आतबट्ट्याचा खेळ झाला आहे, असे म्हणायला हरकत नाही.

पाच वर्षांपूर्वी द्राक्षाचे पीक हे प्रमुख नगदी पीक तसेच परकीय चलन मिळवून देणारे एकमेव पीक मानले जात होते. परंतु, नैसर्गिक आपत्ती, गारपीट, अवकाळी पाऊस, फयान, रोगराईचा सामना, व्यापारी पलायन, कवडीमोल मिळत असलेला द्राक्षाचा भाव या गोष्टींमुळे ते आता दिवसेंदिवस बेभरवशाचे पीक ठरत आहे. निर्यातक्षम प्रतीच्या द्राक्षाचे भाव स्थिर नसल्यामुळे लोकल विक्री करणाऱ्या द्राक्षाचा कचऱ्याप्रमाणे भाव होत असल्यामुळे ह्यकही खुशी, कही गमह्ण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

द्राक्षाच्या पिकाला वर्षभर टप्प्याटप्प्याने खर्च करावा लागत असतो. प्रति वर्षाच्या तुलनेत यावर्षी द्राक्षाचे उत्पादन खर्च वजा जाता झीरो बजेटमध्ये आले आहे. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये द्राक्ष बागांची छाटणी कमी झाली असली तरी पहिल्या टप्प्यातील काढणी झालेल्या द्राक्ष वेलींना खरड छाटणी पूर्वमशागत करणे, उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण करण्यासाठी पाचटाचे मल्चिंग करणे, खते व पाणी देऊन पुढील वर्षाच्या हंगामातील पीक घेण्यासाठी वेलींची खरड छाटणी करून माल काडी तयार करणे गरजेचे असते.

द्राक्ष वेलींना पाणी देण्यासाठी वीजबिल वसुलीच्या धडक मोहिमेमुळे ठिकठिकाणी वीज रोहित्र खंडित केले जात असताना तसेच लोडशेडिंगमुळे वेलींना पाणी देण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. द्राक्ष वेलींच्या खरड छाटणीला प्रारंभ झाला आहे. मात्र, अंतिम टप्प्यातील द्राक्षबागांची काढणी, कांदे, हरभरे, गहू काढणे, द्राक्षबागांची छाटणी पूर्व मशागती करणे ओझरखेड कालव्याला पाणी सोडले असल्यामुळे पाणी भरणे आदी सर्व कामांची एकच धांदल उडाली असून, मजुरांची टंचाई भासत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी