शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

Russia Ukraine War : युद्धात भरडले भारतीय विद्यार्थी! विमानांचे वाढले भाडे; २० हजारांचे तिकीट ६० हजारांना

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 11:46 AM

नाशिक : युक्रेन शहरापासून दूर सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर चर्नीव्हिट्सीमध्ये असल्याने युद्धाची झळ तेंव्हा आमच्यापर्यंत पोहोचली नाही. मात्र युक्रेनमधील ...

नाशिक : युक्रेन शहरापासून दूर सुमारे ४०० किलोमीटर अंतरावर चर्नीव्हिट्सीमध्ये असल्याने युद्धाची झळ तेंव्हा आमच्यापर्यंत पोहोचली नाही. मात्र युक्रेनमधील शहरे जसजसी उद्ध्वस्त होत राहिली तसतसा त्याचा फटका आम्हाला बसला. एटीएममधून पैसे काढण्यावर निर्बंध आले, मॉल्स रिकामे होऊ लागले. खाण्यापिण्याच्या साहित्याचा तुटवडा निर्माण होत गेला आणि विमानांचे भाडे तीन पटीने वाढल्याने मायदेशी परतण्याची वाट दूर होत राहिली. दरदिवशी युद्धाची दाहकता वाढत असल्याने काळजाचा ठोका चुकत होता स्वत:साठी, कुटुंबीयांसाठी आणि विमानतळांवर अडकलेल्या मित्रांसाठी.

युक्रेनच्या विध्वंस झालेल्या भूमीतून मायदेशात सोमवारी परतलेल्या नाशिकच्या रिद्धी शर्मा हिने आपल्या परतीचा थरारक अनुभव सांगितला. युक्रेन सोडण्याची वेळ आली; मात्र परतीचा मार्ग कसा असेल याबाबतची चिंता सतावत होती. खाण्यापिण्याच्या वस्तू लागणार होत्या; पण मॉल्स रिकामे होत राहिले. एटीएमच्या बाहेरही रांगाच रांगा लागत होत्या. शिवाय प्रत्येकाला केवळ २ हजार रुपये इतकेच काढता येत असल्याने इतक्या पैशात पुढे किती दिवस काढायचे, असा प्रश्नही होता.

भारतात परतण्यासाठीच्या विमान प्रवासाच्या यादीत नाव आले; मात्र चर्नीव्हिट्सी ते रुमानियाच्या बुकारेस्टपर्यंत पोहोचण्यासाठीचे ते ११ तास अनिश्चिततेने घेतले होते. कधी काय होईल हे कुणीही सांगू शकत नव्हते. विद्यापीठातून सायरट बाॅडेरकडे बसने निघालो. त्या बसचे वाढीव भाडे आम्हाला द्यावे लागले. बुकारेस्ट विमानतळाच्या दिशेने माणसांचे लोंढे येत असल्याने रस्त्यात कार, ट्रक्स, बस अशा गाड्यांच्या रांगा लागल्याने ट्रॅफीक जाम झाले होते. त्यामुळे आठ किलोमीटर मागेच आम्हाला उतरावे लागले. तेथून पायपीट करीत आम्ही विमानतळावर पोहोचलो. या ठिकाणी युक्रेनी नागरिकांचा रोष भारतीय विद्यार्थ्यांवर वाढत होता. गर्दीमुळे विमानांनाही विलंब होत होता. उणे तापमानात रात्र काढावी लागली; मात्र झोप कुणालाही लागत नव्हती, असे सांगताना रिद्धीच्या डोळ्यांत मात्र अश्रू तरळत होते.

सायंकाळी पाच वाजता बुकारेस्टवरून भारतासाठी भारतीय विमानाने उड्डाण घेतले आणि आम्ही दुसऱ्या दिवशी भारतीय वेळेनुसार शनिवारी दुपारी ३ वाजता दिल्लीला पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर आता सुरक्षित वाटतेय; मात्र युक्रेनमध्ये अडकलेल्या माझ्या मित्र-मैत्रिणींच्या सुटकेची चिंता वाटतेय, असे सांगून रिद्धीच्या नजरा टीव्हीवर युद्धाच्या बातमीवर खिळतात आणि चेहरा खिन्न होतो.

युक्रेनमधून भारतात परतण्यासाठी किमान २० ते २५ हजार रुपये इतके भाडे लागते. परंतु, युद्धामुळे युक्रेनियन भूमीवरून विमानांची उड्डाणे बंद झाली आणि रूमानियाच्या बाॅर्डरवरून विमाने असल्याने तेथून भारतात येण्यासाठी तीनपट भाडे वाढविण्यात आले. म्हणजे २० हजारांचे तिकीट ६० हजारांना झाले. ज्यांना भाडे भरणे शक्य होते, त्यांनी तिकिटे मिळविली.

युक्रेनी आणि भारतीयांमध्ये भांडणे

बुकारेस्टजवळ पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना तेथील सुरक्षारक्षकांनी मारहाण केल्याच्या घटनेनंतर सर्व विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे. युद्ध पेटत असताना विमानतळावर युक्रेनी नागरिक आणि भारतीय विद्यार्थ्यांमध्ये भांडणे होत होती. भारतीय विद्यार्थ्यांसाठी विमानांची व्यवस्था होत असताना तेथील नागरिकांना मात्र विमानांची सोय होत नसल्याने त्यांच्यात रोष होता.

२७ तारखेचे फ्लाईट तिकीट मिळाले

युक्रेनमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण होत असतांना १५ तारखेलाच विद्यार्थ्यांना प्रशासनाने मायदेशी परतण्याचा सल्ला दिला. त्यामुळे रिद्धीने विमानाचे तिकीट घेतले. २७ फेब्रुवारीचे तिकीट मिळाल्याने तीने मायदेशी निघण्याची तयारी केली होती. मात्र २४ तारखेपासूनच युद्धाला सुरूवात झाली आणि तिला विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच थांबावे लागले. २७ तारखेपूर्वीचे तिकीट मिळाले असते तर कदाचित रिद्धी विमानतळावर अडकून पडली असती. कारण युद्धानंतर युक्रेनची हवाई सेवा तत्काळ बंद करण्यात आली. त्यामुळे अनेक विद्यार्थी अडकून पडले होते. 

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाIndiaभारतStudentविद्यार्थी