शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
3
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
4
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
5
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
6
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
7
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास
8
तु्मच्या खाण्यामध्ये येत नाही ना चरबी असलेलं भेसळयुक्त तूप, ५ मिनिटांत असं तपासून घ्या
9
काँग्रेसच्या बड्या नेत्याला केंद्रीय मंत्र्याने दिली ऑफर, हरियाणात भाजपाने टाकला नवा डाव
10
श्रीगोंदा मतदारसंघातील उमेदवारावरून शरद पवार यांनी संजय राऊतांना सुनावले, म्हणाले...
11
५०० रुपयांची लाच घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा; १० वर्षांनी कोर्टाने दिला निकाल
12
IND vs BAN : पहिला सामना जिंकताच BCCI ची मोठी घोषणा; दुसऱ्या कसोटीसाठी भारताचा संघ जाहीर
13
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
14
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
15
'वयस्कर' अश्विनला तोड नाय! भारताला अडचणीतून बाहेर काढले; सामना जिंकवला, विक्रमही नोंदवला
16
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
17
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
18
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
19
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
20
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   

साधुग्राममध्ये शुकशुकाट

By admin | Published: September 26, 2015 10:44 PM

मंडपांची आवरासावर : कपिला संगमावर भाविकांचा ओघ

नाशिक : साधुग्राममधील कपिला संगम वगळता सर्वत्र खालशांनी बस्तान गुंडाळल्याने परिसरात शुकशुकाट पसरला आहे. ‘राम’नामाच्या गजराने गजबजणारे तपोवन शांत झाले आहे.सेक्टर एक, दोनमधील सर्वच खालशांनी साहित्य आवरल्याने भाविकांची गजबज असणारे साधुग्राम ओस पडले आहे. मंडपाची आवरसावर करणाऱ्या कामगारांशिवाय दुसरे काही नजरेस सध्या पडत नाही. मंडपाचे साहित्य भरण्याचे काम कामगार करीत आहेत. खालशांतील साधू-महंतांचे भक्तगणही रवाना झाले आहेत. त्यामुळे भाविकांनी आता साधुग्रामकडे पाठ फिरवली आहे. साडेतीनशे हेक्टरमध्ये प्रशासनाने तपोवनात साधू-महंतांना सुविधा उपलब्ध केली होती. मात्र साधू-महंत, भक्तगण साहित्य घेऊन रवाना झाल्याने शौचालय व स्नानगृहाच्या पत्रे नजरेस पडत आहेत. परराज्यातून कपिला संगमावर दाखल होणारे भाविक आवर्जून साधुग्राममध्ये फेरफटका मारतात. त्यामुळे या भाविकांना खालशांच्या जागेवर कचऱ्याचे दर्शन होते. त्यासाठी महापालिका प्रशासनाने अस्ताव्यस्त पडलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गरज आहे. कपिला संगमावर लक्ष्मण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविक कुतूहलाने रामसृष्टीत जातात. मात्र सेक्टर दोनमधील रामसृष्टीत सफाई न झाल्याने कचरा साचला आहे. (प्रतिनिधी)