शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूच्या उपमुख्यमंत्रीपदी उदयनिधी स्टॅलिन, मंत्रिमंडळात मोठे फेरबदल
2
Team India Announced, IND vs BAN T20 Series: भारताचा संघ जाहीर! बांगलादेशविरूद्ध २ IPL स्टार्स संघात, आणखी एकाचं ३ वर्षाने 'कमबॅक'
3
मेहबूबा मुफ्ती यांनी नसराल्लाहला म्हटलं शहीद; उद्याच्या सर्व निवडणूक सभा केल्या रद्द!
4
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
5
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
6
बांगलादेशी फॅनचा 'पर्दाफाश'! ५ वर्षांसाठी भारतात येण्यावर बंदी येण्याची शक्यता, प्रकरण काय?
7
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
8
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
9
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
10
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
11
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
12
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
13
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
14
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
15
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
16
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
17
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
18
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
19
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
20
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका

सहाब, हमारे बच्चे हमें लौटा दिजीयें; नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांना बिहारच्या 'त्या' मुलांच्या पालकांचे साकडे

By अझहर शेख | Published: June 12, 2023 3:06 PM

नाशिक : बिहारमधून सांगलीच्या निवासी मदरशात धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या ५९ अल्पवयीन मुलांना धावत्या रेल्वेतून रेल्वे पोलिसांनी भुसावळ व ...

नाशिक : बिहारमधून सांगलीच्या निवासी मदरशात धार्मिक शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या ५९ अल्पवयीन मुलांना धावत्या रेल्वेतून रेल्वे पोलिसांनी भुसावळ व मनमाडमध्ये रेस्क्यू केले होते. या मुलांच्या पालका मागील दहा दिवसांपासून नाशिकमध्ये त्यांच्या मुलांना घेण्यासाठी आले आहेत; मात्र सरकारी यंंत्रणांकडून त्यांना कुठलाही सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर सोमवारी (दि१२) या गोरगरीब पालकांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी., यांची भेट घेतली. ‘सहाब, हमारे बच्चे हमें वापस लौटा दिजीयें...’ असे साकडे त्यांना घातले.

मानवी तस्करीच्या संशयातून रेल्वे पोलिसांनी भुसावळ व मनमाड या दोन रेल्वे स्थानकावर मागील आठवड्यात कारवाई केली होती. या मुलांना बिहारमधून सांगलीला घेऊन जाणाऱ्या दोन मौलनांनांही अटक करुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर या सर्व मुलांना नाशिक व भुसावळच्या बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहेत. या मुलांच्या आई-वडिलांपर्यंत जेव्हा ही बातमी माध्यमांद्वारे पोहचली, तेव्हा त्यांनी थेट रेल्वेतून भुसावळ व मनमाड गाठले. मागील दहा दिवसांपासून सुमारे दहा ते बारा बिहारचे नागरिक नाशिकमध्ये दाखल झालेले आहेत. बिहारच्या रेल्वे स्थानकाद्वारे त्या सर्व मुलांचे आरक्षण तिकिटदेखील आहेत, असे पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

दरम्यान, आमदार हिरामण खोसकर, हिंद मुस्लीम हक सुरक्षा व विकास महासमितीचे अंजुम मकरानी, नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा मकरानी यांच्यासह मुलांच्य पालकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी गंगाथरन डी यांची भेट घेतली. सर्व ५९ मुलांना तातडीने त्यांच्या पालकांकडे सोपवावेत अशी मागणी केली. या मुलांचा कुठलाही दोष नाही, किंवा ते गुन्हेगारही नाही, मग त्यांना अन्यायकारक वागणूक का दिली जात आहे? असा सवालही उपस्थित केला. दुसऱ्यांदा या शिष्टमंडळाकडून त्यांना निवेदन देण्यात आले.