शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

वेतन करारही अडकला आर्थिक दृष्टचक्रात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 01:11 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या आर्थिक स्थितीमुळे रखडलेला कामगार करार यंदाही होण्याची कोणतेही चिन्ह दिसत नाही. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन लागू करावे की कराराच्या तरतुदी अंमलात आणाव्यात हा मुद्दा ज्वलंत असल्याने आगामी काळात एस. टी. कामगारांना पुन्हा एकदा या मुद्द्याला सामोरे जावे लागणार आहे.

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या आर्थिक स्थितीमुळे रखडलेला कामगार करार यंदाही होण्याची कोणतेही चिन्ह दिसत नाही. सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन लागू करावे की कराराच्या तरतुदी अंमलात आणाव्यात हा मुद्दा ज्वलंत असल्याने आगामी काळात एस. टी. कामगारांना पुन्हा एकदा या मुद्द्याला सामोरे जावे लागणार आहे. येत्या मार्चमध्ये वेतन करार संपुष्टात येणार असल्याने तत्पूर्वी नव्या वेतन कराराचा मसुदा तयार करणे अपेक्षित आहे. मात्र यंदा अजूनही कराराची चर्चा झालेली नसल्याने यामागे एसटीपुढील आर्थिक संकट असल्याचे बोलले जात आहे.राज्य परिवहन महामंडळ सध्या आर्थिक संकटातून जात असल्यामुळेच महामंडळाकडून काटकसरीचे धोरण अवलंबिले जात आहे. याच भूमिकेतून एसटीतील कर्मचाऱ्यांना १०० टक्के वेतन अदा न करता टप्प्याटप्यापे वेतन दिले जात आहे. संपूर्ण राज्यात हीच परिस्थिती असल्याने कर्मचाऱ्यांपुढे भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. २०१७ पासून राज्यातील १३ कामगार प्रमुख कामगार संघटनांनी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन करार करण्यात यावे, अशी मागणी लावून धरलेली आहे. मात्र त्यावर मंत्री महोदयांनी काढलेल्या तोडग्याबाबत अजूनही कर्मचाºयांचे समाधान झालेले नाही.महामंडळ आर्थिक संकटातून जात असताना पुन्हा नव्याने कामगारांचा वेतन करार करण्याची वेळ आलेली असल्याने करार संपुष्टात येण्याच्या तीन महिने अगोदरच महामंडळाला वेतन कराराचा मुसदा सादर करणे अपेक्षित आहे. परंतु आकडेवारीच्या गोंधळात कर्मचारी आणि संघटनादेखील गुरफटल्या गेल्यामुळे कामगारांपुढील वेतनाचा प्रश्न आजही कायम आहे. महामंडळाने सुचविलेली वाढ मान्य नसेल तर कर्मचाºयांना कंत्राटीचा पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे यंदा महामंडळ वेतन कराराच्या मुद्द्यावर कोणता पर्याय आणणार याविषयीची भीती कर्मचाºयांमध्ये आताच दिसू लागली आहे. (क्रमश:)मंत्रिमंडळाची प्रतीक्षाराज्यात स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात महामंडळाचे खाते कुणाकडे जाते आणि कोण मंत्री असणार याकडे आता कर्मचाºयांचे लक्ष लागून आहे. सातत्याने दाखविण्यात येणारा संचित तोटा, दुसरीकडे महामंडळाच्या विविध विभागांचे करण्यात आलेले खासगीकरण आणि त्यावरील खर्च, गाड्यांच्या खरेदी, अन्य घटकांना देण्यात आलेली कोट्यवधींची मदत आणि कुणाही मागणी नसताना महामंडळात अनावश्यक करण्यात आलेल्या खर्चामुळे तोट्यात भर पडल्याची चर्चा कर्मचाºयांमध्ये आहे. त्यामुळे नव्या राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाचे खाते कुणाकडे जाते हादेखील महत्त्वाचा विषय आहे.

टॅग्स :state transportएसटीNashikनाशिक