शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

कारगिल के वीरो को वंदन शहीदों की मिट्टी को नमन; शौर्य वंदन यात्रेला आज नाशिकमधून प्रारंभ!

By अझहर शेख | Published: July 05, 2024 12:06 PM

कारगिल युद्धात राज्यातील २५ शहीदांच्या जन्मभूमीला नमन करण्यासाठी 'राष्ट्र प्रथम सोशल फाउंडेशन'च्या माध्यमातून विजय दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कारगिल शौर्य वंदन यात्रा आयोजित करण्यात आली आहे.

नाशिक - भारत माता की जय..वंदे मातरम... शहीद जवान तुझे सलाम... शहीद जवान अमर रहे... छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा घोषणा देत शुक्रवारी (दि. ५) पाथर्डी फाटा येथील शिवस्मारकापासून सकाळी साडे दहा वाजता कारगिल शौर्य वंदन यात्रेला प्रारंभ करण्यात आला.

कारगिल युद्धात राज्यातील २५ शहीदांच्या जन्मभूमीला नमन करण्यासाठी 'राष्ट्र प्रथम सोशल फाउंडेशन'च्या माध्यमातून विजय दिनाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत कारगिल शौर्य वंदन यात्रा आयोजित करण्यात आली आहे. ही यात्रा २५ शहीद सैनिकांच्या अंगणात पोहचणार आहे. या दरम्यान त्यांच्या अंगणाची मृदा संकलित करणे हा मुख्य उद्देश यात्रेचा आहे.

विशेष म्हणजे हा उपक्रम कारगिल युद्धात आपल्या पतीला गमविणाऱ्या नाशिकच्या विरपत्नी रेखा खैरनार व माजी सैनिक विजय कातोरे यांनी हाती घेतला आहे. राष्ट्र प्रथम सोशल फाउंडेशन व जय हिंद जनजागृती प्रतिष्ठान, विरपत्नी, वीरमाता बहुउद्देशीय संस्था यांच्या सौजन्याने या शौर्य वंदन यात्रा पार पडत आहे, अशी माहिती कातोरे यांनी दिली. २५ शहिदांच्या अंगणातील माती संकलित केल्यानंतर हे मृदा कलश मुंबईत २६ जुलै रोजी होणाऱ्या कारगिल विजय दिनाच्या कार्यक्रमात ठेवण्यात येणार आहे.

शुभारंभप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित विरपत्नी व माजी सैनिकांच्या पत्नींनी कातोरे यांचे औक्षण केले. तसेच शौर्य वंदन यात्रा रथाचेही पूजन केले. याप्रसंगी विजय कातोरे, विरपत्नी रेखा खैरनार, जयश्री पाटील, सुषमा मोरे, माजी सैनिक पत्नी सरला शिरसाठ, विजया पाटील, भाग्यश्री जाधव, जयश्री हिंगे, माजी सैनिक कॅप्टन किसन गांगुर्डे  यशवंत देवरे, वसंत हिंगे, अनिल सोनवणे, खगेश जाधव आदी उपस्थित होते.

यात्रा या जिल्ह्यांतून जाणार

शौर्य वंदन यात्रा नाशिक, बीड, अहमदनगर, ठाणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, लातूर, रत्नागिरी, अमरावती, परभणी, सोलापूर या जिल्ह्यांतून प्रवास करणार आहे. सातारा जिल्ह्यातील पाच गावांचा यात्रेत समावेश आहे. मंगळवारी (दि. ९) ही यात्रा नाशिकमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Nashikनाशिक