शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

दहा व्यक्ती, पाच संस्थांना मिळणार संत रविदास पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 00:10 IST

नाशिक : यापूर्वी एक व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जाणार संत रविदास पुरस्कार सध्या पाच व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जात असून यापुढे हा पुरस्कार १० व्यक्ती आणि पाच संस्थांना देण्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी (दि. २४) केली.  शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला संत ...

नाशिक : यापूर्वी एक व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जाणार संत रविदास पुरस्कार सध्या पाच व्यक्ती आणि एका संस्थेला दिला जात असून यापुढे हा पुरस्कार १० व्यक्ती आणि पाच संस्थांना देण्याची घोषणा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सोमवारी (दि. २४) केली.  शालेय अभ्यासक्रमातून वगळण्यात आलेला संत रविदास यांच्या जीवनचरित्रावर आधारित धड्याचाही पुन्हा अभ्यासक्रमात समावेश करण्यात येणार असून, प्रत्येक विभागात संत रविदास भवनाच्या कामाला या वर्षीच सुरुवात होणार असल्याचे बडोले यांनी सांगितले.  राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे संस्थेच्या वर्धापन दिनासोबतच माजी मंत्री बबन घोलप यांच्या कला व राजकीय क्षेत्रातील कारकिर्दीच्या सुवर्णमहोत्सवाचे औचित्य साधून ‘त्रिवेणी संगम’ सोहळ्याच्या माध्यमातून सोमवारी बबन घोलप यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सूर्याचार्य कृष्णदेवनंदगिरी महाराज, आमदार भाऊसाहेब कांबळे, रामचंद्र अवसारे, सीमा हिरे, योगेश घोलप, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, शिवसेना जिल्हा प्रमुख विजय करंजकर आदी उपस्थित होते. राजकुमार बडोले म्हणाले, सरकार वंचितांच्या पाठीशी आहे. दरम्यान, सत्काराला उत्तर देताना बबन घोलप यांनी अन्य महामंडळांच्या तुलनेत रविदास महामंडळावर अन्याय होत असल्याचे सांगत इतर महामंडळांप्रमाणेच रविदास महामंडळाच्या लाभांर्थ्यांनाही सोयीसुविधा व योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी केली, तर आमदार योगेश घालप यांना बबन घोलप यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी बोलताना भावना अनावर झाल्याचे दिसून आले. प्रास्ताविक दत्तात्रय गोतीसे यांनी केले. सूत्रसंचालन शंताराम कारंडे यांनी केले.चर्मकार आयोगासाठी पाठपुरावाराज्यात चर्मकार आयोग स्थापन करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. आयोगाला राज्याची मंजुरी मिळाली असून, केंद्र सरकारच्या मान्यतेनंतर लवकरच केंद्र व राज्य चर्मकार आयोग स्थापन करण्याचे आश्वासन राजकुमार बडोले यांनी दिले. दरम्यान, गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र व राज्यात बाबू जगजीवन राम यांच्या नावाने हा आयोग स्थापन करण्याची मागणी राष्ट्रीय चर्मकार महासंघाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Babanrao Gholapबबनराव घोलपRajkumar Badoleराजकुमार बडोले