शहरं
Join us  
Trending Stories
1
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
2
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
3
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
4
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
5
बंडखोरी जिव्हारी; फक्त अजित पवारच नाही, शरद पवारांच्या हिटलिस्टमध्ये राष्ट्रवादीचे 'हे' 10 नेते
6
मेहबूब शेख यांच्या उमेदवारीमागे वेगळीच शंका; माजी आमदारांसह १५० पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
7
पदयात्रेदरम्यान अरविंद केजरीवालांवर हल्ला; AAP चा दावा, भाजपवर हल्ल्याचा आरोप
8
Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी
9
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
10
महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न
11
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
12
आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?
13
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
14
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
15
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
16
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
17
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
18
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
19
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली

कोट्यवधीच्या कामांना कात्री?

By admin | Published: January 05, 2017 1:46 AM

जलयुक्त अभियान सापडणार संकटात : मात्र कोट्यवधींचा महसूलही वाढला

नाशिक : जिल्हा परिषदेची सुमारे २० कोटींची जलयुक्त शिवार अभियानाची कामे चार-दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेत अडकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या २० कोटींच्या सुमारे १३० कामांसाठी दुसऱ्यांदा काढण्यात आलेल्या फेरनिविदांमुळे जिल्हा परिषदेच्या तिजोरीत कोट्यवधी रुपयांचा महसूल वाढल्याचा दावा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी केला आहे. मागील महिन्यात झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांसाठी केवळ आॅनलाइन निविदा राबविण्यात आल्याने तो शासन नियमांचा भंग असल्याचे कारण देत यासाठी वृत्तपत्रात सविस्तर जाहिरात देऊन फेरनिविदा काढण्याची भूमिका जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने घेतली होती. त्यामुळे सर्वसाधारण सभेत लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा उभा संघर्ष निर्माण झाला होता. मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद शंभरकर व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे हे नियम-निकषांवर ठाम राहिल्याने अखेर लोकप्रतिनिधींना नियम-निकषांनुसारच फेरनिविदा काढण्यावर सहमती दर्शवावी लागली. त्यामुळे या २० कोटींच्या १३० कामांसाठी वृत्तपत्रात सविस्तर जाहिरात देऊन फेरनिविदा काढण्यात आल्या होत्या. नव्याने काढण्यात आलेल्या फेरनिविदांमध्ये बहुतेक निविदा धारकांनी अंदाजपत्रकीय रकमांपेक्षा ५ ते १० टक्के न्यूनतम दराने निविदा भरल्याची चर्चा आहे. यामुळे जलयुक्त शिवार कामांमधून शासनाचा सुमारे दीड ते दोन कोटींचा महसूल वाढणार असल्याचा दावा काही माजी लोकप्रतिनिधींनी केला आहे.