शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
3
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
4
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
5
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
6
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
7
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
8
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
9
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
10
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
11
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
12
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
13
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
14
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
15
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
16
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
17
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
18
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
19
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
20
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'

वेतन होत नसल्याने सुरक्षा कर्मचारी संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:27 PM

गेल्या अकरा महिन्यांपासून कामगार व व्यवस्थापन मंडळ यांच्यातील अंतर्गत वादामुळे बंद असलेल्या वसाका कारखान्याची सुमारे चारशे कोटींची मालमत्ता सांभाळणाऱ्या पंधरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना गेल्या सात महिन्यांपासून भाडेकरू संस्था धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थपनेकडून वेतन मिळाले नसल्याने या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ठळक मुद्देलोहोणेर : भाडेकरू संस्था धाराशिव व्यवस्थापनेविरुद्ध तक्रार

लोहोणेर : गेल्या अकरा महिन्यांपासून कामगार व व्यवस्थापन मंडळ यांच्यातील अंतर्गत वादामुळे बंद असलेल्या वसाका कारखान्याचीसुमारे चारशे कोटींची मालमत्ता सांभाळणाऱ्या पंधरा सुरक्षा कर्मचाऱ्यांना गेल्या सात महिन्यांपासून भाडेकरू संस्था धाराशिव कारखान्याच्या व्यवस्थपनेकडून वेतन मिळाले नसल्याने या कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आली आहे.यासंदर्भात एमएससी बँक, कामगार आयुक्त, सहकार सचिव, प्रांताधिकारी, धाराशिव कारखाना व्यवस्थापन मंडळ यांना निवेदनदेऊनही दखल न घेतल्याने या कर्मचाºयांनी संताप व्यक्त केला आहे. वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना हा डीव्हीपी ग्रुपच्या धाराशिव कारखान्यास सुमारे २५ वर्षांसाठी भाड्याने दिला आहे. येथील कर्मचारी व कारखान्याची करोडो रु पयांची मालमत्ता बेवारस सोडण्यात आली आहे. सदरची मालमत्ता येथील सुरक्षा रक्षक कमी संख्या असतानाही डोळ्यात तेल घालून रात्र - दिवस सांभाळत आहेत.भाडेकरू संस्थेने पाठ फिरवली. आता या कारखान्याची सर्वस्वी जबाबदारी एमएससी बँकेकडे आहे. मात्र बँकेच्या संबंधित अधिकारी वर्गाने या कारखान्याकडे व संबंधित कर्मचाºयांच्या मागण्यांकडे डोळेझाक केली आहे. यामुळे या कर्मचाºयांचे सुमारे सात महिन्यांचे पगार थकले असून, सदर कर्मचाºयांचे संसार उघड्यावर पडल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.या संदर्भात संबंधित सुरक्षा कर्मचाºयांनी एमएससी बँक, कामगार आयुक्त, सहकार सचिव, प्रांताधिकारी धाराशिव कारखाना व्यवस्थापनमंडळ यांना निवेदन देऊन वेतनाची मागणी केली आहे. निवेदनावर शांताराम सूर्यवंशी, नंदलाल सोनवणे, सुनील गुंजाळ, शंकर पाटील, विनायक जाधव, मधुकर आहिरे, अण्णासाहेब कवडे, शांताराम पूरकर, देवीदास पवार, बापू आहेर, साहेबराव पाटील, नरेंद्र पवार, दिनेश ठाकरे, विशाल निकम, राहुल देवरे, गफूर तांबोळी आदींच्या स्वाक्षºया आहेत.कामगार संघटना-व्यवस्थापन मंडळात वादभाडेकरू संस्थेने सन २०१८-१९ चा गळीत हंगाम सुरू केला, मात्र सदरचा हंगाम हा २२ जानेवारी रोजी कामगार संघटना व भाडेकरू संस्था व्यवस्थापन मंडळ यांच्या अंतर्गत वादामुळे बंद पडला. तेव्हापासून ते आतापर्यंत सुमारे बारा महिन्यांच्या कालावधीत सुमारे चारशे करोड रु पयांची ही मालमत्ता येथील सुरक्षा रक्षक इमाने इतबारे सांभाळत आहेत. संप काळात या कर्मचाºयांना साखर व मोलेसेस विकून काही प्रमाणात पगार देण्यात आला. मात्र गेल्या सात महिन्यांपासून या बंद असलेल्या कारखान्याकडे भाडेकरू संस्था अथवा मालकी हक्क असलेल्या एमएससी बँकेच्या प्रतिनिधींनी पाठ फिरवली आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने