शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

अंतापूरला चक्क गावाबाहेरझाडाखाली विलगीकरण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 9:41 PM

सटाणा : कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या संक्रमणामुळे संपूर्ण जग हादरले आहे. लॉकडाउनच्या काळात समाजातील प्रत्येक घटक अन्न- पाण्यावाचून वंचित राहू नये म्हणून मोफत धान्य देण्यात आले.

सटाणा (नितीन बोरसे)सटाणा : कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या संक्रमणामुळे संपूर्ण जग हादरले आहे. लॉकडाउनच्या काळात समाजातील प्रत्येक घटक अन्न- पाण्यावाचून वंचित राहू नये म्हणून मोफत धान्य देण्यात आले. मात्र ते रेशनकार्ड आणि मजुरीअभावी खऱ्या वंचितांच्या पोटात न गेल्यामुळे आज ते कष्टकरी कुपोषितांच्या रांगेत उभे असल्याचे भयावह वास्तव बागलाणचे आहे.यंदा लॉकडाउनच्या काळात गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थानसह राज्याच्या अन्य ठिकाणी शेकडो मजूर अडकले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांची घरवापसी सुरू झाली आहे. मात्र गाव पातळीवर त्यांना गावाबाहेर विलगीकरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यांना चौदा दिवस कामावर जाण्यास मज्जाव केला जात असल्यामुळे आज तरी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासन मोफत धान्य वाटत आहे. परंतु या कष्टकरी मजुरांकडे रेशन कार्डच नसल्यामुळे ते या योजनेपासून वंचित राहत आहेत. वास्तविक बाहेरून स्थलांतरित होणाºया रहिवाशांना शासकीय नियमानुसार घोषित केलेल्या विलगीकरण केंद्रात भरती करून त्याच्या अन्नपाण्याची सोय करणे प्रशासनाचे कर्तव्य असताना शेकडो स्थलांतरित मजुरांची मात्र हेळसांड होताना दिसत आहे.---------------------------------थाळीमर्यादेमुळेशेकडो उपाशीपोटीकामाअभावी परप्रांतीय अथवा स्थानिक मजुरांची उपासमारी होऊ नये म्हणून शासनाने पाच रुपयात शिवभोजन थाळीची व्यवस्था केली आहे. सध्या बागलाण तालुक्यातील सटाण्यात १५० थाळीचे दोन केंद्र सुरू केले आहेत. मात्र ते अपुरे पडत असून, एका तासात तीनशे थाळ्या संपल्यामुळे अनेक गरीब मजुरांना उपाशी राहावे लागत आहे. शहरात आणखी तीन केंद्र तर नामपूर येथे दोन, जायखेडा, ताहाराबाद, मुल्हेर, डांगसौंदाणे येथे शिवभोजन केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.-------------------------------------------पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची समस्याबागलाण तालुक्यात सहा ठिकाणी कोरोना संशयितांसाठी विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. त्यामध्ये अजमीर सौंदाणे येथील शासकीय एकलव्य रेसिडेन्सीयल स्कूल, नामपूर, सटाण्यात चार ठिकाणचा समावेश आहे. मात्र बहुतांश ठिकाणी पाण्याची आणि स्वच्छतागृहांची मोठी समस्या दिसून येत आहे.-------------------------------कुणी घेतोयडोंगर कपारीचा सहाराकोणी नदीकाठी, कोणीझाडाच्या आडोशाला तर कोणी डोंगर कपारीचा सहारा घेऊन उघड्यावर कोरोनाचे संक्र मण रोखण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र अशा परिस्थितीत प्रशासन बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे.--------------------------बागलाण तालुक्यात कोरोना संशयितांसाठी सहा विलगीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. संशयितांचे नमुने घेण्यासाठी पश्चिम भागासाठी डांगसौंदाणे ग्रामीण रु ग्णालय कोरोना सेंटर राहील, मोसम आणि काटवन भागासाठी नामपूर ग्रामीण रुग्णालय तर उर्वरित भागासाठी सटाणा ग्रामीण रु ग्णालय कोरोना सेंटर म्हणून राहील. तसेच ज्या मजुरांना रेशनकार्डअभावी धान्य मिळत नसेल अशांना सामाजिक संस्थाकडून मदत केली जात आहे. - जितेंद्र इंगळे पाटील, तहसीलदारआम्ही ऊसतोडणी मजूर आहोत. आम्ही नुकतेच स्थलांतरित झाल्यामुळे आम्हाला चौदा दिवस वस्तीच्या बाहेर ठेवले आहे. रेशनकार्ड नसल्यामुळे आणि झाडाखालीच विलगीकरण केल्यामुळे हाताला काम नाही म्हणून आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने आमची विलगीकरण केंद्रात सोय करावी.- नानाजी भवरे, मजूर, अंतापूर

 

टॅग्स :Nashikनाशिक