शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

राम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान सांगण्याची गरज नाही; महाअधिवेशनात उद्धव ठाकरेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 07:59 IST

नाशिकमध्ये मंगळवारी  आयोजित शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाचा समारोप हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या सभेने झाला.

नाशिक : एरव्ही सनातन धर्मावर कुणी बोललं की त्याला जाब विचारला जातो. मग तुमच्याच पक्षातील एक मंत्री हिंदू धर्मात शंकराचार्यांचे योगदान काय, असा प्रश्न उपस्थित करतो तेव्हा कुणीच का बोलत नाही. भाजपमध्ये शंकराचार्यांचा अवमान आणि भ्रष्टाचाऱ्यांना स्थान असेल तर मग तुम्ही सनातन धर्म मानता की नाही, असा प्रश्न विचारत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. श्रीराम मंदिरासाठी शिवसेनेचे योगदान काय, हे इतरांना सांगण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

नाशिकमध्ये मंगळवारी  आयोजित शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या महाअधिवेशनाचा समारोप हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर उद्धव ठाकरे यांच्या सभेने झाला. यावेळी त्यांनी धर्मावर अधर्माचे संकट आल्याने ‘दार उघड, बये दार उघड’ असे जगदंबा मातेला साकडे घालत सभेला सुरुवात केली. श्रीराम आमच्या श्रद्धेचा विषय असून राममंदिरासाठी शिवसेनेचे योगदान मोठे असल्याचा पुनरूच्चार त्यांनी केला. अयोध्येत श्रीराम मंदिराची उभारणी, काश्मीरमधील कलम ३७० रद्द करावे यासाठीच आम्ही भाजपला पाठिंबा दिला होता, असेही ते म्हणाले.

२०१४ला शिवसेनेला संपविण्याचा प्रयत्नबाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे काय करणार, असा विचार करत दिल्लीत शिवसेनेला संपविण्याचा विचार झाला होता, असा गौप्यस्फोट उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. त्यावेळी शिवसेनेचे ६३ आमदार निवडून आले. भाजपने दिलेले वचन मोडलं नाहीतर फडणवीस हे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री झाले असते, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिर