शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
2
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
3
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
4
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
5
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
6
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
8
रोहित की गंभीर? कानपूर टेस्टमध्ये ट्विस्ट आणण्यात नेमकं कुणाचं डोकं?
9
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
10
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
11
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
12
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ
13
'घड्याळ' चिन्हाबाबत आजही सुनावणी झालीच नाही; सुप्रीम कोर्टाने दिली पुढची तारीख
14
“आमचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा मनोज जरांगे असतील”; तिसऱ्या आघाडीतील नेत्याचे मोठे विधान
15
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
16
"तुझ्या भावाकडून सुंदर मूल हवंय"; दिरासोबत पळून गेली बायको, नवरा म्हणतो, मला वाचवा कारण...
17
'219 मंदिरांची विटंबना, मूर्तींची तोडफोड', उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचा धक्कादायक दावा
18
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
19
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
20
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण

शहरातील अनेक मोहल्यांमध्ये शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 4:15 AM

लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांची गर्दी नाशिक : शहरातील अनेक लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. लवकर नंबर लागावा, ...

लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांची गर्दी

नाशिक : शहरातील अनेक लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठ नागरिकांची गर्दी दिसून येत आहे. लवकर नंबर लागावा, यासाठी अनेक नागरिक सकाळपासूनच केंद्रांवर रांगा लावतात. जोपर्यंत साठा आहे, तोपर्यंत लसीकरण केले जाते. मात्र, त्यानंतर उर्वरित नागरिकांना दुसऱ्या दिवशी येण्याचा सल्ला दिला जात असल्याने अनेकांना परत घरी जावे लागते.

वीकेंड लॉकडाऊनचा दरांवर परिणाम

नाशिक : वीकेंड लॉकडाऊनचा भाजीपाल्याच्या दरावर परिणाम होत आहे. अनेक व्यापारी शुक्रवारी मोजकाच माल खरेदी करत असल्याने भाजीपाल्याचे दर कोसळतात. सोमवारनंतर मात्र पुन्हा दर सावरतात, अशी सध्याची स्थिती आहे. यामुळे शेतकऱ्यांना मात्र आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

डिझेलमुळे ग्रामीण भागात दरवाढ

नाशिक : डिझेलचे दर वाढल्याने ग्रामीण भागातील ट्रॅक्टर चालकांनी नांगरणी, वखरणीचे दर मोठ्या प्रमाणात वाढविले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. अनेक शेतकरी शेतीची नांगरणी, वखरणी ही कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने करत असतात.

पाणी जपून वापरण्याचे आवाहन

नाशिक : पावसाळा अजून महिना दीड महिना लांब असून, धरणातील पाणीसाठी अल्प प्रमाणात शिल्लक असल्याने, नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हयाच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ऑक्सिजन पुरवठा करण्याची मागणी

नाशिक : शहरातील अनेक रुग्णालयांना अद्याप ऑक्सिजनचा पुरेसा पुरठा होत नसल्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांचा जीव टांगणीला लागला आहे. राज्य शासनाने सर्व रुग्णालयांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

दुकानाचे भाडे भरण्याचा प्रश्न

नाशिक : मागील महिनाभरापासून सलून, ब्युटी पार्लर बंद असल्याने, या व्यावसायिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आगामी काळात लाइटबिल, दुकानाचे भाडे कसे भरायचे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेक कारागिरांना उदरनिर्वाहासाठी पर्यायी रोजगार शोधावा लागला आहे.

पर्यटकांची संख्या मंदावली

नाशिक : गोदाघाटावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या पूर्णपणे मंदावली असल्याने, या परिसरात व्यवसाय करणाऱ्या अनेक छोट्या-मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय बंद झाले आहेत. अनेकांना रोजचा रोजगार मिळत नसल्याने, त्यांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. धार्मिक विधी करण्यासाठी येणारे नागरिकही कमी झाले आहेत.

भाजी विक्रेत्यांच्या संख्येवर परिणाम

नाशिक : बाजार समितीमध्ये किरकाेळ विक्रेत्यांना प्रवेश बंद केल्याने, शहरातील भाजी विक्रेत्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम झाला आहे. कोरोनामुळे नव्यानेच भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांना माल भरणेही कठीण झाले आहे. यामुळे अनेकांना हा व्यवसायही बंद करावा लागतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आता नेमके करावे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.