शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काँग्रेसची चौथी उमेदवार यादी जाहीर, अंधेरीत उमेदवार बदलला; कुणाला मिळाली संधी?
2
विद्यमान आमदाराचा पत्ता कट! शिंदेंनी माजी खासदाराला दिली विधानसभेची उमेदवारी
3
Maharashtra Vidhan Sabha 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपात घोळ? सोलापूरात एकाच जागेवर ठाकरेंचा अन् काँग्रेसचा उमेदवार
4
हैदराबादमध्ये फटाक्यांच्या दुकानाला भीषण आग, ८ वाहने जळून खाक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: सस्पेन्स संपला! आदित्य ठाकरेंविरोधात शिंदेंचा उमेदवार ठरला; दुसऱ्या यादीत कोणाची नावे?
6
मनसेने जाहीर केली सहावी यादी; अशोक चव्हाणांच्या मुलीविरोधात 'हा' उमेदवार मैदानात
7
Maharashtra Election 2024: "...पण काही लोकांबद्दल मला दुःखही आहे", फडणवीस असं का म्हणाले?
8
महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्ष अद्यापही वेटिंगवरच; आठवले नाराज, फडणवीसांनी दिला मोठा शब्द
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत मानसिंगराव नाईक की सत्यजित देशमुख, कोण मारणार बाजी? महाडिक बंडखोरीच्या तयारीत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, मविआ'ला खोचक टोलाही लगावला
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : इंडिया आघाडीमध्ये फूट? विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव उमेदवार उभे करणार; महाविकास आघाडीच्या अडचणी वाढणार
12
Maharashtra Election 2024: शरद पवार- एकनाथ शिंदेंच्या 'या' उमेदवारांनी घेतली जरांगेंची भेट
13
अर्ज भरण्यासाठी उरले फक्त 2 दिवस; महायुती-मविआत जागावाटपाचा तिढा कायम...
14
 शरद पवारांनी दिलं तिकीट; कोणत्या मुद्द्यावर लढणार निवडणूक, काय म्हणाले फहाद अहमद?
15
युगेंद्र पवारांसाठी वडील श्रीनिवास पवार मैदानात; ग्रामदैवताला नारळ वाढवत प्रचाराचा शुभारंभ
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत भाजपाला मोठा धक्का! सम्राट महाडिक बंडखोरी करणार, उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
17
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले
18
"लाडकी बहिण म्हणायचं अन्..."; मुलीवर गुन्हा दाखल होताच बाळासाहेब थोरात यांची संतप्त प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
19
इस्रायलमध्ये दहशतवादी हल्ला? बस स्टॉपला ट्रकची धडक; 35 हून अधिक जखमी
20
'महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये भाजपचे सरकार येणार', गृहमंत्री अमित शाहांचा दावा

दोन महिन्यांत जिल्ह्यातील सेतू केंद्रे बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 11:40 PM

राज्य शासनाच्या लोकसेवा हक्क अधिकारान्वये नागरिकांना आॅनलाइन सेवा प्रदान करण्याचा भाग म्हणून येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सेतू केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून, नागरिकांनी महा आॅनलाइनच्या माध्यमातून आॅनलाइन प्रणालीचा वापर करून शासनाच्या सेवा प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी केले आहे.

नाशिक : राज्य शासनाच्या लोकसेवा हक्क अधिकारान्वये नागरिकांना आॅनलाइन सेवा प्रदान करण्याचा भाग म्हणून येत्या दोन महिन्यांत जिल्ह्यातील सेतू केंद्रे टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार असून, नागरिकांनी महा आॅनलाइनच्या माध्यमातून आॅनलाइन प्रणालीचा वापर करून शासनाच्या सेवा प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी केले आहे.महसूल दिनानिमित्त पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, आपलं सरकार या पोर्टलच्या माध्यमातून सरकारच्या ३७९ सेवा आॅनलाइन करण्यात आल्या असून, त्यात महसूल विभागाशी निगडित ५१ सेवा आहेत. या पोर्टलच्या माध्यमातून नजीकच्या काळात सर्व प्रकारचे शासकीय दाखले आॅनलाइन देण्यात येणार आहेत. कोणत्याही व्यक्तीने सेतू केंद्रात जाऊ नये, अशी त्यामागची कल्पना असून, ‘महा ई-सेवा केंद्र’ व सेतू यांच्या सर्व सेवा महाआॅनलाइनच्या पोर्टलवरून आॅनलाइन पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीने देण्यात येणार आहेत. या प्रणालीमुळे नागरिकांचा सेतू केंद्राच्या चकरा मारण्याचा त्रास वाचेल शिवाय बनावट व चुकीच्या दाखल्यांना आळा बसण्यास मदत होणार आहे. नाशिक जिल्ह्यात जून महिन्यात एक लाख ३० हजार इतक्या नागरिकांना आॅनलाइनच्या माध्यमातून सेवा देण्यात आली असून, राज्यात नाशिक जिल्ह्याचा प्रथम क्रमांक लागला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील तांत्रिक दोष दूर झाल्याने पेठ, सुरगाणा या अतिदुर्गम तालुक्यातही महा आॅनलाइनच्या माध्यमातून सेवा देण्यात आता कोणत्याही अडचणी नसल्यामुळे नजीकच्या काळात सेतू केंदे्र बंद करून नागरिकांनी घरी बसल्या शासनाच्या आपलं सरकार या पोर्टलच्या माध्यमातून सेवा प्राप्त करून घ्याव्यात, असे सांगून गेल्या महिन्यात जिल्ह्यात बनावट शासकीय दाखले देण्याच्या प्रकारांच्या तक्रारींची दखल घेत दोन केंद्रे रद्द करण्यात आली असून, जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात दोन गुन्हे नाशिकमध्ये व एक कळवण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.