शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजपविरोधी सर्वपक्षीय सामीलकीचेच संकेत !

By किरण अग्रवाल | Updated: October 13, 2019 01:57 IST

ठिकठिकाणी परस्परांविरुद्ध झालेल्या बंडखोऱ्यांवरूनच नव्हे, तर इतरही अनेक कारणं-प्रसंगातून भाजप-शिवसेनेत ‘युती’ असूनही सुरू असलेली अंतस्थ धुसफूस लपून राहिलेली नाही. अशात निवडणूक रिंगणातील परपक्षीय उमेदवाराची भेट घेऊन त्यास शुभेच्छा दिल्या जात असतील तर त्यातून दुसºया, पर्यायी छुप्या राजकीय सामीलकीचेच संकेत घेता यावेत.

ठळक मुद्देअपक्ष उभे राहिलेल्या स्वकीयांची बंडखोरी रोखण्याचे सोडून परपक्षातील उमेदवाराची भेट घेण्यामागील गणित काय? भाजप-शिवसेना ‘युती’ तील परस्परांबद्दलच्या अविश्वासाची स्थिती संपुष्टात आली नसल्याचेच चित्र बंड शमविण्यात सेना नेतृत्वाला यश आलेले नाही

सारांश

राज्यातील विधानसभा निवडणुकीला भाजप-शिवसेना ‘युती’ने सामोरे जात असले तरी या उभय पक्षांतील परस्परांबद्दलच्या अविश्वासाची स्थिती संपुष्टात आली नसल्याचेच चित्र दिसून येते आहे. कारण तसे नसते तर ‘युती’चा आकडा वाढविण्याऐवजी वैयक्तिक वा विरोधकास साहाय्यभूत ठरू शकणारी पावले पडताना व आकडेमोड घडून येताना दिसली नसती.निवडणुकीच्या प्रचाराला आता आठवडा उरला आहे, त्यामुळे दिवसेंदिवस प्रचाराचा माहौल तापू लागला आहे. जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आदित्य ठाकरे, राष्टÑवादीचे नेते छगन भुजबळ, खासदार अमोल कोल्हे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आदींच्या सभा झाल्या असून, त्यात काश्मिरातील ३७० कलमापासून ते स्थानिक पातळीवरील कांदा व नार-पारच्या पाणीप्रश्नापर्यंतचा ऊहापोह घडून आला आहे. कॉँग्रेसने त्यांच्या काळात काय केले, हा प्रश्न जसा सत्ताधाऱ्यांकडून विचारला जातो आहे, तसाच भाजपने गेल्या ५ वर्षांत काय केले, असाही प्रश्न विरोधकांकडून केला जातो आहे. त्यामुळे प्रचारातल्या आरोप-प्रत्यारोपांचे गांभीर्य वाटेनासे झाले आहे. पण, दुसरीकडे यंदा बंडखोरांचे पीक अमाप असताना त्यांना दटावण्याऐवजी सांभाळून घेण्याचे व काही बाबतीत प्रोत्साहनाचीही भूमिका घेतली जाताना दिसून आल्याने आश्चर्य वाटून जाणे स्वाभाविक ठरले आहे.विशेषत: नाशिक पश्चिम मतदारसंघात भाजप उमेदवार सीमा हिरे यांच्या विरोधात शिवसेनेचे विलास शिंदे अपक्ष म्हणून उभे आहेत. सिडकोतील साºया शिवसैनिकांचे त्यांना समर्थन असल्याचे उघडपणे बोलले जाते. पण त्यांच्याकडून ‘युतीधर्म’ धोक्यात आणला गेला असतानाही अद्याप त्यांचे बंड शमविण्यात सेना नेतृत्वाला यश आलेले दिसत नाही. उलट त्यांची बंडाळी रोखण्यासाठी खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या बैठकीनंतर ते अधिकच जोशात आलेले दिसत आहेत. म्हणजे, बैठकीत कान धरला गेला, की प्रोत्साहन दिले गेले असाच प्रश्न उपस्थित व्हावा. परिणामी आता याबाबतचा फैसला थेट उद्धव ठाकरे यांच्या कोर्टात गेला आहे.महत्त्वाचे म्हणजे, स्वपक्षातील बंडाळी शमवता आलेली नसताना शिवसेना नेते राऊत हे भाजपतून बंडखोरी करीत राष्टÑवादीकडून निवडणूक रिंगणात उतरलेल्या बाळासाहेब सानप यांच्या भेटीस गेलेले व बंद दाराआड गुफ्तगू करताना दिसून आले. म्हणायला या भेटीला सदिच्छा भेट म्हटले जात असले तरी, ऐन निवडणूक काळात अशा भेटी घडतात तेव्हा त्यातून अप्रत्यक्षपणे काही संकेत प्रसृत झाल्यावाचून राहात नाहीत. मुळात, भाजपतून बंडखोरी केलेले सानप हे काही अपक्ष म्हणून उभे राहिलेले नाहीत. त्यांनी पर पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांची बंडखोरी टाळण्याचा प्रयत्न म्हणून या भेटीकडे पाहता येऊ नये. शिवाय, ही भेट सहज वा अपघाताने घडलेली नाही. राऊत स्वत: सानपांकडे गेले. त्यामुळे त्यामागे निव्वळ सदिच्छेचा हेतू असणे शक्य नाही, आणि तसा असेल तर तेही आक्षेपार्ह ठरावे. कारण ‘युतीधर्म’ निभावत भाजप उमेदवारासाठी मते मागण्याचे सोडून परपक्षीयाला सदिच्छा दिल्या जाणार असतील, तर त्याही बंडखोरीतच मोडाव्यात.

थोडक्यात, ‘युती’त निर्भेळ व आलबेल स्थिती नाही हे यातून लक्षात यावे. सहयोगी पक्षापेक्षा आपला नंबर अगर आकडा वाढवतानाच परपक्षीयाशी स्रेह-सलोखा राखून उद्याच्या चर्चेसाठी दारे उघडी करून ठेवण्याचा प्रयत्न यामागे असण्याची शक्यता नाकारता येणारी नाही. याचाच अर्थ, वातावरण बदलते आहे किंवा बदलले जाऊ शकते. शिवसेना-भाजपमधील अंतस्थ स्थिती सुदृढ नसल्याचेच हे लक्षण म्हणता यावे. नांदगावमध्ये शिवसेना उमेदवारासमोर कायम असलेल्या भाजप नेत्याची व इगतपुरीमधील एका माजी आमदार कन्येचीही अपक्ष उमेदवारी तेच सांगून जाणारी आहे. हे असे केवळ नाशिक जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्टÑात घडले आहे. कुणी कुणाला थांबवायला, रोखायला तयार नाही. परस्पर हिशेब चुकते होत असतील तर होऊ द्या, अशी भूमिका बाळगली जाताना दिसत आहे. अशातून कॉँग्रेस आघाडीच्या उमेदवारांसाठी साहाय्यभूत स्थिती निर्माण होणे आश्चर्याचे ठरू नये. राष्टÑवादीच्या उमेदवारासोबत झालेल्या शिवसेना नेत्याच्या निवडणूकपूर्व सदिच्छा भेटीकडे त्याचदृष्टीने पाहता यावे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019PoliticsराजकारणBJPभाजपाShiv SenaशिवसेनाBalasaheb Sanapबाळासाहेब सानपSanjay Rautसंजय राऊत