शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

साहेब, तुम्ही कारखाना उभा कराच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 12:05 AM

नांदूरवैद्य : साहेब, तुम्ही आम्हाला आरोग्य, शैक्षणिक सुविधा दिल्यामुळे आमचे अनेक प्रश्न मार्गी लागले. परंतु आता तुम्ही इगतपुरी, त्रंबक, नाशिक व सिन्नर तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकरी उभा करायचा असेल तर तुम्ही साखर कारखाना उभा कराच! त्यामुळे येथील शेतकरी समृद्ध होऊन आनंदात शेती करेल, अन्यथा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाहीत. साहेब, कारखाना उभा कराच, असे आर्जव इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे आर्जव : इगतपुरी तालुक्यात साखर कारखाना सुरू करण्यासाठी महसूलमंत्र्यांना साकडे

नांदूरवैद्य : साहेब, तुम्ही आम्हाला आरोग्य, शैक्षणिक सुविधा दिल्यामुळे आमचे अनेक प्रश्न मार्गी लागले. परंतु आता तुम्ही इगतपुरी, त्रंबक, नाशिक व सिन्नर तालुक्यांतील ऊस उत्पादक शेतकरी उभा करायचा असेल तर तुम्ही साखर कारखाना उभा कराच! त्यामुळे येथील शेतकरी समृद्ध होऊन आनंदात शेती करेल, अन्यथा शेतकरी देशोधडीला लागल्याशिवाय राहणार नाहीत. साहेब, कारखाना उभा कराच, असे आर्जव इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना केले.इगतपुरी तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी संगमनेर येथे महसूलमंत्री थोरात यांची भेट घेऊन तालुक्यातील शेतकरी तेथील भौगोलिक परिस्थिती चांगली असताना देखील इगतपुरी, त्रंबक येथील शेतकऱ्यांना भातशेतीवर अवलंबून राहावे लागते. भाताला गेल्या पाच वर्षांपासून शाश्वत भाव नाही, ऊस उत्पादनात हा तालुका अग्रेसर असून सन २०२० मध्ये इगतपुरीचे व नाशिकचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात लागवडीखाली होते. परंतु हक्काचा कारखाना नसल्याने इतर ठिकाणी ऊस नोंद करण्यासाठी व पाठविण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हक्काचा कारखाना नाही. इगतपुरी तालुक्याला संगमनेरसारखे तुम्हीच उभे करू शकता, अशी भावनिक हाक थोरात यांना इगतपुरीतील शेतकऱ्यांनी आमदार सुधीर तांबे यांच्या उपस्थितीत घातली.इगतपुरी तालुक्यात सात ते आठ धरणे असून या धरणांमुळे तालुक्यातील व इतर तालुक्यांतील मोठ्या प्रमाणात क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या शेतकऱ्यांनी कोणते पीक घ्यावे तर ते म्हणजे फक्त ऊस, तुम्ही जर इगतपुरी तालुक्यात साखर कारखाना खासगी तत्त्वावर उभा केला तर नाशिक, सिन्नर, इगतपुरी व त्रंबक तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करतील. याप्रसंगी बैठकीत ऊस उत्पादक शेतकरी गोरख भाऊ मराडे, सुनीलभाऊ वाजे, सुदाम भोसले, ज्ञानेश्वर जमदाडे, रामदास भोसले, निवृत्ती वाकचौरे, रमेश भोसले, समाधान शेलार, रमेश बेंडकोळी, सुनील गाढवे आदी शेतकरी सहभागी झाले होते.इगतपुरी तालुक्यातील धरणामुळे इतर तालुक्यांत देखील मोठ्या प्रमाणात ऊस लागवड होऊ शकेल. हक्काचा नासाका असताना दोन हजार हेक्‍टर क्षेत्र ऊस लागवड केलेले होते. त्यात एकट्या इगतपुरी तालुक्यात हजार ते अकराशे हेक्टर, नाशिक तालुका सातशे ते आठशे हेक्टर, सिन्नर दोनशे ते अडीचशे व त्रंबक शंभर ते दीडशे क्षेत्रात लागवड होत होती. परंतु आज जर संगमनेरच्या धर्तीवर साखर कारखाना उभा राहिला तर या चारही तालुक्यांत मिळून चार हजार हेक्‍टरच्या आसपास ऊस लागवड होईल, अशी माहिती यावेळी आयोजित बैठकीत शेतकऱ्यांनी केली.

टॅग्स :FarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखाने