शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...
2
माझी लाडकी बहीण योजना बंद होण्याची चर्चा; अदिती तटकरेंनी केला खुलासा 
3
Bhagyashree Navtake IPS: १२०० कोटींचा घोटाळा, सीबीआयचा गुन्हा; कोण आहेत भाग्यश्री नवटके?
4
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी शिवसेनेत, जेलमधून परतताच पक्षप्रवेश
5
IND A vs Pak A : 'हायहोल्टेज' मॅच! युवा टीम इंडियानं दिला पाकिस्तान 'अ' संघाला दणका
6
Maharashtra Election 2024: नितीन गडकरींच्या घरी फडणवीस-बावनकुळेंचे 2 तास खलबते
7
IND vs PAK : कॅचेस विन मॅचेस! Ramandeep Singh च्या अफलातून कॅचनं फिरली मॅच (VIDEO)
8
Noel Tata: नोएल टाटांची पत्नी कोण? त्यांना कोणत्या गोष्टींची आहे आवड?
9
Navya Haridas: प्रियंका गांधींविरोधात भाजपाचा उमेदवार ठरला! नव्या हरिदास कोण?
10
राजेंद्र शिंगणेंच्या हाती तुतारी; पुतणीने शरद पवारांना विचारला खरमरीत सवाल!
11
‘वंचित’कडून विधानसभेसाठी आणखी १६ उमेदवारांची घोषणा; साताऱ्यातील २ जागांचा समावेश!
12
अखेर रणजीतसिंह मोहिते पाटलांचं ठरलं! आमदारकीचा राजीनामा; लवकरच पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
13
ठाकरेंना कोणत्या जागा हव्यात, ज्यामुळे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गाडा फसलाय?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मोहोळ, पंढरपूर अन् माढ्याचं गणित चुकल्यास पवारांचं राजकारण बिघडणार
15
Jharkhand Election 2024: भाजपाची पहिली यादी आली! झारखंडमधील ६६ उमेदवारांच्या नावाची घोषणा
16
वडील बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर झिशान सिद्दिकींची संतप्त पोस्ट; शायरीतून रोख कुणाकडे?
17
भाजप नेतृत्वाच्या मनात नेमकं काय?; फडणवीस-अजितदादा बाहेर, अमित शाह-CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा!
18
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला की नाही? फडणवीसांनी दिली महत्वाची माहिती
19
माढ्यात पवारांना धक्का बसणार? काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराने मराठा समाजाकडेच मागितली उमेदवारी
20
JMM-काँग्रेसमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, कोण किती जागांवर निवडणूक लढवणार? जाणून घ्या...

घोटी महामार्गावर सीटूचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2020 3:05 PM

घोटी : देशाचे हित साधताना कुठ गेला कामगार कायदा, कुठ गेला स्वामिनाथन आयोग यापुढे भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही. शेतकरी, कामगार, कष्टकर्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, स्थानिक भूमिपुत्रांना कंपनी व शासकीय ठिकाणी नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने घ्यावे अन्यथा या पेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सिटूचे जिल्हा नेते कॉ. देविदास आडोळे यांनी घोटी टोलप्लाझा जवळ मोर्चा काढुन मुंबई आग्रा महामार्गावर रास्तारोको दरम्यान सरकारला दिला.

घोटी : देशाचे हित साधताना कुठ गेला कामगार कायदा, कुठ गेला स्वामिनाथन आयोग यापुढे भूलथापांना आम्ही बळी पडणार नाही. शेतकरी, कामगार, कष्टकर्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, स्थानिक भूमिपुत्रांना कंपनी व शासकीय ठिकाणी नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने घ्यावे अन्यथा या पेक्षाही मोठे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सिटूचे जिल्हा नेते कॉ. देविदास आडोळे यांनी घोटी टोलप्लाझा जवळ मोर्चा काढुन मुंबई आग्रा महामार्गावर रास्तारोको दरम्यान सरकारला दिला.भाजप सरकारच्या शेतकरी, कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवार ( ८ ) दुपारी बारा वाजता शहरातून सिटूच्या वतीने मोर्चा काढत काही काळ मुंबई नाशिक महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यामुळे काही काळ वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. मोर्चेकऱ्यांनी निवेदन देताच पोलिसांनी तातडीने वाहतूक व्यवस्था सुरळीत केली.घोटी शहरातील बँक आॅफ इंडिया कार्यालयापासून अकरा वाजता मोर्चाला सुरवात झाली. या मोर्चात सहभागी कामगार, शेतकरी, शेतमजुरांनी विविध घोषणांचे फलक हातात घेत भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी केली. मोदी शहा हटाव, देश बचाव, कामगार एकता जिंदाबाद, शेतकरी एकजुटीचा विजय असो आदि घोषणाबाजीने शहर व परिसर दुमदुमून गेला होता. या मोर्च्यात आशा कर्मचा-यांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेतला होता. सिटूच्या वतीने प्रथमच सर्वच स्तरातील नागरिकांसमवेत भुतोनभविष्यती असा मोर्चा काढण्यात आला.यावेळी सिटूचे जिल्हा नेते कॉ. देविदास आडोळे, सिटूचे जिल्हा सेक्र ेटरी चंद्रकांत लाखे, कामगार नेते कांतीलाल गरूड,तालुकाध्यक्ष दत्ता राक्षे, शिवराम बांबळे, विश्वास दुभाषे, रवींद्र गतीर, निवृत्ती कडू, सदाशिव डाके, आप्पा भोले, निलेश बोराडे, मनोज भोर यांसह मोठ्या प्रमाणात मोर्च्यात शेतकरी, कामगार, घरकामगार, बेरोजगार तरु ण सहभागी झाले होते.

टॅग्स :Nashikनाशिक