शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

जायकवाडीसाठी साडेसहा टीएमसी पाणी रवाना

By संकेत शुक्ला | Published: August 04, 2024 7:05 PM

चोवीस तासांत दोन टीएमसी : जिल्ह्यातील धरणांतून विसर्ग सुरूच

नाशिक: गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे ४ ऑगस्टपर्यंत तब्बल साडेसहा दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीकडे रवाना झाले असून, गेल्या चोवीस तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे सुमारे दोन टीएमसी (दलघफू) पाणी जायकवाडीकडे सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात अजून दोन दिवस पावसाचा अलर्ट देण्यात आल्यामुळे विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. धरणक्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे सुमारे ५ धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. गंगापूर धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे रविवारी (दि.४) रात्री ८ वाजेपासून ८००० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला होता. जिल्ह्यातील कडवा धरणातून आतापर्यंत १ टीएमसी, दारणातून ५.२ टीएमसी, भाममधून १.७ टीएमसी याशिवाय भावली धरणासह गोदावरी कालव्यांमधून एकत्रित ६.४६४ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. गेल्या चोवीस तासांत नाशिक शहरात १०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला असून, त्र्यंबक, इगतपुरीमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. हवामान खात्याने अजूनही दोन दिवस अलर्ट दिला असून, विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.सुरू असलेला विसर्ग...

धरण (क्युसेक)दारणा २२,९६६भावली १,२१८कडवा ८,२९८भाम ४,३७०पालखेड ५,५७०नांदूरमध्यमेश्वर बंधारा : ४४,७६८गंगापूर ८,०००होळकर पूल : २,२२७

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणNashikनाशिक