शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
2
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
3
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
4
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
5
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
6
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
7
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
8
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
9
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
10
Bihar Politics : नितीश कुमार यांना भारतरत्न देण्याची मागणी; JDU कडून पोस्टरबाजी; भाजपचाही पाठिंबा
11
अरे देवा! मालगाडीचे २ डबे घसरले; बादल्या, कॅन घेऊन डिझेल लुटण्यासाठी लोकांची झुंबड
12
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
13
राहुल गांधी कोल्हापूरात पोहचताच उचगावातील कौलारू घरात गेले, तिथे कोणाला भेटले? 
14
Weightless Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
15
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
16
NIA: महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये एनआयएच्या धाडी; जालना, छत्रपती संभाजीनगरमधून तिघांना घेतलं ताब्यात
17
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
18
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS
19
Navratri Puja Vidhi 2024: इच्छित मनोकामनापूर्ती करणारे 'काम्य व्रत' ललिता पंचमीला कसे करायचे? वाचा!
20
'आनंद आहेच पण आता...'; मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यावर 'हास्यजत्रा'चे दिग्दर्शक सचिन गोस्वामींची मार्मिक पोस्ट

‘स्मार्ट सिटी’चा पुनर्प्रस्ताव ‘एसपीव्ही’विनाच?

By admin | Published: February 02, 2016 12:07 AM

सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष : पुण्याच्या प्रस्तावाबाबत राजकीय पक्षांकडून चाचपणी

 नाशिक : केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ अभियानात पहिल्या टप्प्यात नाशिकची बस चुकल्यानंतर आता प्रशासनाकडून जून अखेरपर्यंत पुन्हा एकदा नव्याने प्रस्ताव पाठविण्याची तयारी सुरू झाली असली तरी पुनर्प्रस्ताव ‘एसपीव्ही’सह की ‘एसपीव्ही’विना याबाबत पुन्हा एकदा राजकीय स्तरावर घमासान पहायला मिळण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेने ‘एसपीव्ही’ला अटी-शर्तींवर मान्यता देत उपसूचनांसह ठराव केंद्राला सादर केला होता. त्यामुळे पुणे शहराचा समावेश एसपीव्हीविना झाला की एसपीव्हीसह याबाबतची चाचपणी राजकीय पक्षांकडून केली जात असून, सत्ताधारी पक्ष पुनर्प्रस्तावाबाबत नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष लागून राहणार आहे. केंद्र सरकारने ‘स्मार्ट सिटी’च्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या दोन शहरांचा समावेश केला, तर नाशिक ३४व्या क्रमांकावर फेकले गेले. आता केंद्र सरकारने पुन्हा एकदा ३० जूनअखेर फेरप्रस्ताव सादर करण्याची संधी दिली असल्याने नाशिक महापालिकेनेही त्यादृष्टीने तयारी करण्याचे संकेत आयुक्तांनी दिले आहेत. स्मार्ट सिटीबाबत काही सुधारणा व दुरुस्त्यांसह नव्याने फेरप्रस्ताव सादर होताना पुन्हा एकदा महासभेची मान्यता घ्यावी लागणार आहे.