शहरं
Join us  
Trending Stories
1
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
2
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
3
राजकारण करावं तर समोरासमोर करावं...; संदीप क्षीरसागर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!
4
उदय सामंतांविरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला; पक्षप्रवेश होताच हाती मिळाला AB फॉर्म
5
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 
6
"मुलीला शिकवलंस तर सुशिक्षित नवरा कुठून आणणार?", लोकांचे टोमणे; मजुराची लेक झाली अधिकारी
7
ग्राहकाचे 50 पैसे ठेवणं डाक विभागाला भोवलं! आता भरपाई पोटी किती रुपये द्यावे लागणार? निकाल जाणून थक्क व्हाल!
8
Maharashtra vidhna Sabha 2024: शिंदेंच्या शिवसेनेचे पावशे निवडणूक लढविण्यावर ठाम
9
मोठी बातमी! "उद्धव ठाकरेंनी विश्वासघात केला, जो शब्द..."; संभाजी ब्रिगेडनं युती तोडली
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या यादीत किती मराठा उमेदवार?
11
"उद्धव ठाकरेंनी नातं..."; अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देताच शिवसेना नेत्याने सोडलं मौन
12
"माझ्या मतदारसंघात शरद पवार फॅक्टर चालणार नाही’’, अजित पवार गटातील आमदाराचा दावा
13
'आम्ही युद्धाचे नाही, संवाद अन् मुत्सद्देगिरीचे समर्थक', BRICS मधून पीएम मोदींचा जगाला संदेश
14
आमदार विरुद्ध आमदार! कोरेगावात 'तुतारी' वाजणार की 'धनुष्यबाण' सुस्साट? दोन शिंदेंमध्ये लढत
15
जनतेच्या मनातला सामान्य आमदार मिळेल; उमेदवारी घोषित होताच महेश सावंत यांचा टोला
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पोलिसांना आणखी एक आरोपी सापडला; आतापर्यंत ११ जणांना अटक
17
माहिमच्या हायप्रोफाइल लढतीत उद्धव ठाकरेंनी उतरवला शिवसैनिक, कोण आहेत महेश सावंत?
18
Mahayuti Seat Sharing: 106 जागांचा गुंता, कोणत्या विभागातील किती जागांची घोषणा बाकी?
19
मंत्रि‍पदासाठी फोन आला, १०० रुपये उसने घेऊन कपडे घेतले अन् शपथविधीला गेले; श्रीगोंद्यातील नेत्याचा किस्सा! 
20
अरे देवा! ७ मुलांची आई बॉयफ्रेंडसह पळून गेली, ढसाढसा रडत मुलांनी गाठलं पोलीस ठाणं, म्हणाले...

... तर कसलेल्या जमिनीवरच स्वतःचे सरण रचू; भूमिहीन शेतकऱ्यांचा संताप

By अझहर शेख | Published: February 28, 2023 6:39 PM

नाशिकच्या भूमिहीन शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला लेखी इशारा

नाशिक : नांदगाव तालुक्यातील मौजे सजा-साकोरे, पांझण, डॉक्टरवाडी भागातील वनजमिनी शासनाने गोरगरीब शेतकऱ्यांना कसण्यासाठी दिली होती. या जमिनीवर एका खासगी कंपनीकडून बेकायदेशीरपणे अतिक्रमण केल्याने राखीव वनजमिनीचा सौदा झाल्याचे उपवनसंरक्षकांच्या पत्रातून समोर आला. येथील शेतकऱ्यांना बळजबरीने जमिनी कसण्यापासून रोखत त्यांना धमकावले जात असल्याचा आरोप करत पिडित शेतकरी महिला, पुरुषांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी धडक दिली. अपर जिल्हाधिकाऱ्यांना घेराव घालत दोन दिवसांत प्रशासनाने दखल घेतली नाही, ‘तर आम्ही कसत असलेल्या जमिनीवर स्वत:चे सरण रचून जीवन संपवू असा इशारा यावेळी भूमीहीन शेतरकऱ्यांनी दिला.

साकोरे येथील जुन्या गट क्रमांक ८०१पैकी मौजे पांझणच्या सरकारी पडीत जमिनीवर केलेले वतीधारकांचे कब्जे कायमस्वरूपी करून त्यांना शेतीचा उतारा दिला जावा. तसच सौर उर्जा कंपनीच्या अतिक्रमणाची चौकशी करून वन विभागाचा ना हरकत दाखला नसतानाही कंपनीकडून केले जाणारे बांधकाम तत्काळ बंद करावे, या मागण्यांसाठी राज्य किसान सभा, जिल्हा शाखेच्या वतीने मंगळवारी (दि.२८) जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या आंदोलन करत फलक झळकावले. तसेच येथील मध्यवर्ती सभागृहात सुरू असलेल्या बैठकीत ठिय्या देत अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न यावेळी पिडित शेतकऱ्यांनी केला.याबाबत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, मुख्य वनसंरक्षक, उपवनसंरक्षक, नांदगाव तहसिलदार सर्वांना लेखी स्वरुपात यापुर्वीही निवेदने दिली आहेत; मात्र कोणीही दखल घेतलेली नाही. यामुळे आता पुन्हा जर गुंडांनी धमकावले आणि जमिन कसण्यापासून रोखले तर त्याच जमिनीवर भूमिहीन शेतकरी स्वत:ला संपवून घेतील, असे लेखी पत्रात म्हटले आहे. तब्बल वीस भूमिहिन शेतकऱ्यांनी असे आत्महत्या करण्याचे पत्र यावेळी प्रशासनाकडे सुपुर्द केले. यावेळी राज्य उपाध्यक्ष राजू देसले, जिल्हाध्यक्ष देविदास भोपळे, प्रकाश भावसार यांच्यासह स्थानिक कब्जेदार शेतकरी माणिक हिरे, तुकाराम सोनवणे, ताराबाई बोरसे, सुमन साळुंके, शिवाजी जाधव, राजेंद्र सुर्वे, रमेश कदम, प्रकाश भावसार रत्नाबाई अहिरे, सुपादाबाई अहिरे, साहेबराव झेला आदी उपस्थित होते.

गुंडांकडून जीवे ठार मारण्याच्या धमक्या!

भारतीय कम्युनिस्ट पक्ष व राज्य किसान सभेच्या नेतृत्वात वीस पिडित भुमीहिन पुरूष, महिला शेतकऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांना स्वतंत्ररित्या लेखी पत्र देत आत्महत्येचा इशारा दिला आहे. या पत्रात त्यांनी नांदगाव तालुक्यात कंपनीच्या बांधकामाच्या ठिकाणी बाऊन्सर घेऊन येणाऱ्या गुंडांच्या नावांचाही उल्लेख केला आहे.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी