शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंचा अपघाताआधी मागितला होता राजीनामा", कदमांचा गौप्यस्फोट
2
पुराचे थैमान! नेपाळमध्ये परिस्थिती गंभीर; १७० जणांचा मृत्यू, १११ जण जखमी, ४२ बेपत्ता
3
कार अपघातात एअरबॅग उघडली पण आईच्या मांडीवर बसलेल्या २ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी मृत्यू
4
"भाग्यश्री आत्राम अहेरीत पराभूत होतील"; शरद पवारांच्या उमेदवाराला काँग्रेसचाच विरोध
5
"केवळ ७% जीडीपी वाढ पुरेशी नाही..," RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचं बेरोजगारीबद्दल मोठं वक्तव्य
6
IND vs BAN : जबरदस्त सेटअप! कमालीच्या इन स्विंग चेंडूवर बुमराहनं उडवला रहिमचा त्रिफळा
7
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
8
खुशखबर! सुनीता विल्यम्स पृथ्वीवर लवकरच परतणार; नासाची टीम अंतराळात पोहोचली, पहिला व्हिडीओ आला समोर
9
शेअर मार्केटमध्ये मोठी गॅप डाऊन ओपनिंग; निफ्टी सपोर्ट लेव्हलवर, भूराजकीय तणावात खरेदी करावी की नाही?
10
"कुठे गेले ते १५ मिनिटवाले...?"; आमदार नितेश राणेंचा ओवैसींवर हल्लाबोल
11
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
12
Success Story: ८००० रुपये कर्ज घेऊन सुरू केलं काम; आज ८०० कोटींच्या मालकिण, कपड्यांचा आहे मोठा ब्रँड
13
आधी संसदेत बसवताना केला होता विरोध, आता उदयनिधी यांच्या हातातच 'सेंगोल' दिसले
14
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
15
बाप बन गया रे! रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, पापाराझींसमोर व्यक्त केल्या भावना
16
सोशल मीडियात ट्रेंड करणारे 'पंखेवाले बाबा' लड्डू मुत्या स्वामी नेमके कोण आहेत?
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
18
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
19
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
20
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 

... तर सरकारला सहकार्य करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:14 AM

सिटू भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना डॉ.कराड यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या बारा दिवसाच्या लॉकडाऊन काळातील ...

सिटू भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना डॉ.कराड यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या बारा दिवसाच्या लॉकडाऊन काळातील वेतन देण्यास अनेक उद्योग तयार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा उद्योगांना पूर्ण वेतन देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनावरील उपचारासाठी लोकांना कर्जबाजारी व्हावे लागले आहे. दिवाळे निघाले आहे.अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत. म्हणून सर्वांचा मग तो कामगार असो वा व्यावसायिक ५० लाख रुपयांचे विम्याचे सुरक्षा कवच मिळाले पाहिजे. दुसऱ्या लाटेत सरकारला संपूर्ण सहकार्य केले आहे. मात्र तिसऱ्या लाटेसाठी सरकारने पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. एक रुपयाही खर्च न करता वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे. अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही. कोणतेही सहकार्य केले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. प्राप्तीकर लागू नसलेल्या नागरिकांच्या खात्यावर ७५०० रुपये जमा करावेत. केरळ सरकारच्या धरतीवर लॉकडाऊनच्या काळातील सर्व नागरिकांचे वीजबिल, पाणीबिल माफ करण्यात यावे. सातपूर, अंबड, सिन्नर माळेगाव, मुसळगाव, दिंडोरी, पिंपळगाव औद्योगिक वसाहतीत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करून कामगारांचे मोफत लसीकरण करण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. यावेळी सीताराम ठोंबरे, कल्पना शिंदे, तुकाराम सोनजे, संतोष काकडे, मोहन जाधव आदी उपस्थित होते.