शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जा उपयुक्त

By admin | Published: November 04, 2015 10:43 PM

रामचंद्र भोगले : चेंबरतर्फे आयोजित कार्यशाळेत प्रतिपादन

नाशिक : दिवसेंदिवस विजेचा वापर वाढत असून, त्या तुलनेत विजेची निर्मिती होत नसल्याने मागणी व पुरवठा यांचा समन्वय साधला जात नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांना सौर ऊर्जेचा आणि पंपाचा वापर सोयीचा आणि वरदान ठरू शकेल, असे मत महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष रामचंद्र भोगले यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर यांच्या वतीने अशोका सभागृहात सौरपंप आणि पी. व्ही. पॅनल याविषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. खासदार हेमंत गोडसे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता बी. जी. जाधव, एम.एस.ई.डी.सी.एल.चे मुख्य अभियंता व्ही. बी. बढे, चेंबरचे उपाध्यक्ष संतोष मंडलेचा, चेंबरच्या अपारंपरिक ऊर्जा समितीचे अध्यक्ष यू. के. शर्मा आणि उपाध्यक्ष विलास शिरोरे यावेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचा वापर केल्यास मोठ्या प्रमाणात विजेची बचत होऊ शकते. हीच वीज अन्यत्र वापरली जाईल. विजेचे दर वाढले की त्याचा थेट परिणाम उद्योजकांवर होत असतो. शेतकऱ्यांना देण्यात येणारी वीज बिल माफी किंवा वीज बिलातील सवलत भरून काढण्यासाठी उद्योजकांवरच अधिभार लावला जातो. त्यामुळे उद्योजकांना महाग दराने वीज घ्यावी लागते. त्यामुळे यावर मात करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर वाढला पाहिजे, असेही भोगले म्हणाले. विलास शिरोरे यांनी प्रास्ताविक, तर निता आरोरा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी ममता पाटील, अश्विनी बोरस्ते, योगीता अहेर, तसेच चेंबरचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)