शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

‘कळसुबाई’ शिखरावर सैनिकांनी फडकावला तिरंगा! 'हर शिखर तिरंगा’ मोहिमेत देशातील २८पर्वत करणार सर!

By अझहर शेख | Updated: August 16, 2023 14:47 IST

दोन तासांत शिखरमाथा गाठल्यानंतर तेथील मंदिराजव या चमूच्या सैनिकांनी तिरंगा मोठ्या अभिमानाने अन् सन्मानाने फडकाविला.

नाशिक : हलका-मध्यम सरींचा वर्षाव अंगावर झेलत भारतमातेचा जयजयकार करत सैन्याच्या ‘ॲडव्हेंचर विंग’च्या चमूने मंगळवारी (दि.१५) राज्यातील सर्वोच्च शिखर असलेल्या कळसुबाईवर चढाई सुरू केली. दोन तासांत शिखरमाथा गाठल्यानंतर तेथील मंदिराजव या चमूच्या सैनिकांनी तिरंगा मोठ्या अभिमानाने अन् सन्मानाने फडकाविला.

भारतीय सैन्यदलातील कर्नल रणवीर सिंह जामवाल यांच्या नेतृत्वात मे महिन्यात ‘हर शिखर तिरंगा’ ही आगळीवेगळी साहसी मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत देशभरातील २८ राज्यांमध्ये भ्रमंती करत तेथील सर्वोच्च शिखरावर चढाई करून तिरंगा फडकाविला जात आहे. मंगळवारी या चमूने कळसुबाईच्या रूपाने १५वे सर्वोच्च शिखर सर केले. हा चमू राजस्थानच्या गुरूशिखर, गुजरातचे गिरणार आणि मध्यप्रदेशच्या धूपगडावर तिरंगा फडकावून स्वातंत्र्यदिनाच्या पुर्वसंध्येला नाशिक शहरात दाखल झाला होता. या चमूने मंगळवारी (१५) पहाटे कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी पोहचला. कळसूबाई शिखराची उंची समुद्र सपाटीपासून १ हजार ६४६ मीटर इतकी आहे, तर पायथ्याच्या बारी गावातून याची ऊंची अंदाजे ९०० मीटरपर्यंत आहे. 

झुंजुमुंज होताच जामवाल यांच्यासह १३सैनिक व स्थानिक युवकांनीसुद्धा हातात तिरंगा ध्वज खेत भारतमातेचा जयघोष केला. एकमेकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत कळसूबाई शिखरावर चढाई सुरू केली. सकाळी आठ वाजता माथा गाठून ध्वजारोहण करत तिरंग्याला ‘सॅल्यूट’ केला. यावेळी स्थानिक युवक, युवतींनी जल्लोषपूर्ण वातावरणात देशभक्तीपर घोषणा देत शिखर दणाणून सोडला. यानंतर पुढील प्रवासात दुपारी मुंढेगावातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसोबत जामवाल यांनी संवाद साधला. त्यानंतर नाशिकमधून पुढे गोव्याच्या दिशेने प्रवास सुरू केला.ऑगस्टमध्ये या शिखरांवर फडकवणार तिरंगाऑगस्टअखेरपर्यंत सैनिकांचा हा चमू २४ तारखेला गोव्यामधील उच्चशिखर सोसोगडावर त्यानंतर २६ तारखेला कर्नाटकच्या मुलनगिरी शिखर, २७ तारखेला तमिळनाडूमधील दोटाबेटा पर्वतावर आणि २८ तारखेला केरळमधील अनामुरी शिखरावर हा चमू तिरंगा फडकावणार आहे. ही मोहीम अशीच पुढे सर्व २८ राज्यांत पोहचणार आहे. ऑक्टोबरमध्ये मोहिम ‘फत्ते’ होणार आहे.

..असा आहे साहसवीरांचा चमूकर्नल रणवीर सिंह जामवाल, सुभेदार रवी देवडकर, तेसांग चोसगेल, हवालदार केवल, नेहपाल सिंह, राकेश यादव, नायक गणेश पाल, संजय कुमार, लोगु के., लोबसंग बापू, रूपक छत्री, थुटेन, राजा रामचिराय, समयाक राज मेहता असा १४ सैनिकांचा हा चमू आहे. या चमूने आतापर्यंत देशातील १४शिखरे लीलयापणे सर केली आहेत. 

टॅग्स :NashikनाशिकIndependence Dayस्वातंत्र्य दिन