शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

भिवंडीच्या धर्तीवर नाशिकच्या आयटी पार्कच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2022 1:43 AM

माहिती तंत्रज्ञान उद्योग म्हणजे आपले भवितव्य आहे. राज्यात ज्याप्रमाणे भिवंडीला पाचशे एकर क्षेत्रांवर आयटी पार्क मंजूर झाला आहे, त्याच धर्तीवर नााशिकमध्येही साडेतीनशे क्षेत्रांतील आयटी हबच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी (दि.१) नाशिकमध्ये केली. केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक गुंतवणूक प्रकल्पसुद्धा नाशिकला आणण्यासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

ठळक मुद्देनारायण राणे यांची घोषणा : आयटी कॉनक्लेव्ह २०२२ ला उद्योजकांचा प्रतिसाद

नाशिक : माहिती तंत्रज्ञान उद्योग म्हणजे आपले भवितव्य आहे. राज्यात ज्याप्रमाणे भिवंडीला पाचशे एकर क्षेत्रांवर आयटी पार्क मंजूर झाला आहे, त्याच धर्तीवर नााशिकमध्येही साडेतीनशे क्षेत्रांतील आयटी हबच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी (दि.१) नाशिकमध्ये केली. केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक गुंतवणूक प्रकल्पसुद्धा नाशिकला आणण्यासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

नाशिक महापालिकेच्या वतीने आडगाव शिवारात ३३५ एकर क्षेत्रांत खासगी सहभागातून आयटी पार्क साकारण्यात येणार असून अशाप्रकारे आयटी पार्कसाठी पुढाकार घेणारी नाशिक महापालिका देशातील पहिलीच महापालिका आहे. या पार्कमध्ये गुंतवणूक यावी यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.१) हॉटेल ताजमध्ये नाशिक ‘आयटी कॉनक्लेव्ह-२०२२’ आयोजित करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन करताना राणे बोलत होते. यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, लक्ष्मण सावजी, विजय साने, शहराध्यक्ष गिरीश पालवे, ज्येष्ठ नेते प्रकाश पाठक, भाजप लघू उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार यांच्यासह अन्य महापालिका पदाधिकारी उपस्थित हेाते.

उद्योगांविषयी बोलताना नेहमी उद्योगपतींनी किती नफा कमवला यापेक्षा किती लोकांना राेजगार दिला, किती उत्पादन केले आणि देशाच्या आर्थिक विकास दरात किती भर घातली याकडे देखील लक्ष पुरवण्याची गरज असते. नाशिकमध्ये येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान उद्योगांमुळे नाशिकचे अर्थकारण बदलेल तसेच दरडोई उत्पन्न वाढेल, असेही राणे म्हणाले.

यावेळी माजी मंत्री जयकुमार रावळ यांनी उत्तर महाराष्ट्राची राजधानी असलेले नाशिक आता आयटी हब होत असून त्यामुळे स्मार्ट नाशिक ब्रँड नाशिक बनणार असल्याचे सांगितले.

इन्फो..

राणे यांनी पालकत्व स्वीकारावे

महापालिका निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते. त्यानंतर नाशिकमध्ये सिटी लिंक, निओ मेट्रो असे अनेक प्रकल्प राबवण्यात आले. आता आय टी हबसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाशिकला दत्तक घ्यावे, असे यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.

इन्फो...

महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले की, गेल्या तीस वर्षांपासून नाशिकमध्ये आयटी उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न सुरू होते. ३२ टक्के युवक हे आयटीतील नोकऱ्यांसाठी पुणे, बंगळुरू, हैदराबाद येथे जातात. आता नाशिकमध्ये आयटी पार्क सुरू हेाणार असल्याने ब्रेन ड्रेन टळेल, असेही ते म्हणाले.

नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ३३५ एकर क्षेत्रांवर पार्क साकारण्यात येणार आहे. तसे संमतीपत्र नागरिकांनी महापालिकेला दिले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अर्थकारण वाढेल तसेच प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष दोन लाख रोजगार वाढतील, असे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकITमाहिती तंत्रज्ञानNarayan Raneनारायण राणे