शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
2
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
3
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
4
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
5
उद्धव ठाकरे नाही, नाना पटोले मुख्यमंत्री होणार? दाव्यावर काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया यायला लागल्या
6
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
7
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
8
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
9
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
10
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
11
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
12
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी
13
राज्याच्या राजकारणात काय शिजतंय?; विधानसभेपूर्वीच महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता
14
Tarot Card: सोमवार थोडा कंटाळवाणा, सप्ताह ठरणार आनंदाचा; वाचा टॅरो भविष्य!
15
Gold Rate Today : सप्टेंबरच्या अखेरच्या आठवड्यात सोन्याच्या दरात तेजी; पाहा २२ कॅरेट, २४ कॅरेट सोन्याची किंमत
16
WTC Points Table मध्ये आता लंकेचाही 'डंका'; न्यूझीलंडला दिला मोठा दणका!
17
ऐहिक वासना नष्ट होऊन सर्व सुखाची प्राप्ती करून देणारा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी; एका वाचकाचा प्रासादिक अनुभव!
18
पितृपक्षात गुरुपुष्य योग: १० राशींना लॉटरी, अचानक धनलाभ; लक्ष्मी-कुबेर कृपा, मालामाल व्हाल!
19
मुख्यमंत्रिपदासाठी नाना पटोलेंचं नाव पुढे करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना संजय राऊतांचा टोला, म्हणाले...
20
शरद पवार गटाच्या मतदारसंघावर दावा; विधानसभा निवडणुकीत वसंत मोरेंची होणार कोंडी?

सहा लाख हेक्टरवरील पेरण्या आटोपल्या

By admin | Published: August 06, 2016 1:29 AM

दमदार पाऊस : मका, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ

 नाशिक : जुलैमध्ये संततधार असलेल्या पावसाने आॅगस्टच्या सुरुवातीलाच पुन्हा दमदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील जवळपास ९० टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत. खरिपाच्या सरासरी लागवडीखालील एकूण सहा लाख ५२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी पाच लाख ८२ हजार ७१६ हेक्टर (८९.३० टक्के) क्षेत्रावरील पेरण्या आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाल्या आहेत.खरिपाच्या भात लागवडीचे क्षेत्र ६६ हजार ७०० हेक्टर क्षेत्रापैकी ६१ हजार ४७२ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या आटोपल्या आहेत. खरीप ज्वारीच्या तीन हजार ९९० हेक्टर क्षेत्रापैकी ६३३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. खरीप बाजरीचे एक लाख ६० हजार २०० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी एक लाख २४ हजार ७६२ हेक्टर क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्या आहेत. भूईमूगाचे सरासरी क्षेत्र ३१ हजार ३०० हेक्टर असून त्यापैकी २३ हजार १२ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीनचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ५७ हजार हेक्टर असून त्यापैकी ५६ हजार ६४४ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. येत्या आठवडाभरात खरिपाच्या शंभर टक्के क्षेत्रावरील पेरण्या आटोपल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. दमदार पावसाने खरिपाच्या पिकांना चांगलाच आधार दिला आहे. आता काही काळ पावसाने उघडीप घेतल्यास पिकांची जोमाने वाढ होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे; मात्र अशीच संततधार कायम राहिल्यास त्याचा पिकांवर प्रतिकूल परिणाम होण्याची चिन्हे आहे. (प्रतिनिधी)