शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

नोटांच्या तुटवड्यामुळे रखडल्या रब्बीच्या पेरण्या

By admin | Published: November 17, 2016 12:18 AM

शेतकरी हवालदिल : अवघ्या ८ टक्के क्षेत्रावर पेरण्या

नाशिक : पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्याने सर्वच क्षेत्रांतील व्यवहार रोडावले आहेत. याचा सर्वाधिक फटका शेती क्षेत्राला बसला आहे. ऐन पेरणीच्या मोसमात शेतकऱ्यांकडे नवीन चलन नसल्याने बियाणे आणि रासायनिक खते खरेदी करणे अशक्य झाले आहे. रब्बी हंगामाची पेरणी रखडली असून, जिल्ह्णात अवघ्या ८.५ टक्केच पेरण्या झाल्या आहेत.यंदा जिल्ह्णात समाधानकारक पाऊस पडल्याने रब्बीच्या पेरणीस पोषक वातावरण आहे. दिवाळीनंतर गहू, हरभरा पेरणी तसेच लाल-उन्हाळ कांदा लागवडीची लगबग सुरू होते. बाजरी व मक्याचे पीक काढून त्याच शेतात रब्बीची पेरणी होत असल्याने आता रब्बीच्या कामांना गती आलेली असताना केंद्र शासनाने नोटा बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांची परवड झाली असून, रासायनिक खते व बियाणे विक्रे ते त्यांना उभे करत नाहीत. परिणामी, गत आठ दिवसांपासून पेरणीला ब्रेक लागला आहे. गत वर्षी पावसाचे प्रमाण कमी असताना ८४ हजार २५४ हेक्टरवर ६३.९१ टक्के पेरणी झाली होती. या तुलनेत यंदा वरु णराजाची कृपादृष्टी असून, केवळ ९ हजार ७१३ हेक्टरवर अवघी ८.५ टक्के पेरणी झाली आहे. सिन्नर, निफाड, पेठ, इगतपुरी, दिंडोरी, कळवण, नाशिक या सात तालुक्यांमध्ये शून्य टक्के पेरणी झालेली दिसते. त्र्यंबकेश्वर, सुरगाणा आणि देवळा या तीन तालुक्यांत अवघ्या ४ टक्क्यांपर्यंत पेरणी आटोपली असताना नोटा बंदीच्या निर्णयामुळे बळीराजा हैराण झाला आहे. येवला, चांदवड व मालेगाव या तीन तालुक्यांमध्ये समाधानकारक पेरणी झालेली दिसते. प्रामुख्याने गत आठ दिवसांपासून शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते उधारीतही मिळत नाही आणि रोखीत घेण्यासाठी त्यांच्या हाती नवा पैसा नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झालेली दिसते. (प्रतिनिधी)