शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

संत निवृत्तिनाथ यात्रेच्या तयारीला वेग

By admin | Published: January 31, 2016 10:22 PM

उत्साह : जिल्ह्यातील ठिकठिकाणाहून दिंडीचे प्रस्थान सुरू

त्र्यंबकेश्वर : अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या संत निवृत्तिनाथ यात्रेची लगबग सुरू झाली असून, पालिका सभागृहात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांची नियोजित बैठक प्रांताधिकारी बाळासाहेब वाक्चौरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीस तहसीलदार बहिरम, नगराध्यक्ष विजया लढ्ढा, उपनगराध्यक्ष संतोष कदम, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, धनंजय तुंगार, योगेश तुंगार, डॉ. भागवत लोंढे, डॉ. योगेश मोरे, पोलीस निरीक्षक देवीदास पाटील, परिवहन महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते. यात्रा नियोजन बैठकीसह यात्रेत व्यवसायासाठी जागा ताब्यात घेणे, हॉटेल वगैरेंना रंगरंगोटी, सामान भरणे, तसेच गावात ट्रकद्वारे प्रासादिक वाणाच्या वस्तू, किराणा माल येत आहे. यात्रेच्या ४-५ दिवस अगोदर गावात रहाट पाळणे, विद्युत पाळणे, मौत का कुआॅँ, विद्युत चकऱ्या आदि मनोरंजनाची साधने येत असतात. केळीच्या ट्रक आपापल्या ठिकाणी येत असतात. येत्या २-३ दिवसात दिंड्या येतील. सर्व दिंड्या दशमीच्या दिवशी शहरात दाखल होतात. प्रत्येक दिंडीची जागा ठरलेली असते. दरम्यान, त्र्यंबक नगरपालिका यात्रेच्या तयारीला लागली असून, आरोग्य विभागाचे साहित्य कीटकनाशके, झाडू खरेदी आदि स्वच्छता विभागाचे साहित्य मागविण्याचे टेंडर्स काढले आहे. पाण्याचे, पथदीपांचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी नगरसेवक मंडळी तसेच कर्मचारी वर्ग तयारीला लागले आहेत. पोलीस विभागाने सध्या हव्या असलेल्या बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. परिवहन महामंडळाने जादा गाड्यांचे नियोजन केले असून, यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही असे नियोजन केले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणतर्फे सर्व आखाड्यांना पाणी पुरविण्यात आले आहे. तथापि, यात्रेसाठी आलेल्या दिंड्यांना तात्पुरते पाणी पुरवावे, अशी दिंडीकऱ्यांची मागणी आहे.शहरात त्र्यंबक नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक माने, डॉ. भागवत लोंढे, पं. स. तालुका वैद्यकीय अधिकारी योगेश मोरे यांनी दिली.