शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
2
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
3
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
4
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
5
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ३० जणांचा मृत्यू, १७ जखमी
6
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
7
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
8
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
9
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
10
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
12
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
13
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
14
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
15
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
16
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video
17
पुण्यातील नवीन विमानतळाला 'हे' नाव देण्यासाठी प्रयत्न करणार; गडकरींचं आश्वासन
18
Bengaluru Murder : फ्रीजमध्ये सर्वात खालच्या कप्प्यात होतं शिर, पोलिसांनाही फुटला घाम
19
"वर्षा उसगावकर कोण हे मला माहितच नव्हतं", निक्की पुन्हा बरळली, म्हणाली- "बिग बॉसमध्ये आल्यानंतर..."
20
शाब्बास पोरा! वडिलांसोबत चहा विकला, मोलमजुरी करून उदरनिर्वाह; IAS होऊन रचला इतिहास

खरिपाच्या पेरणीला प्रारंभ

By admin | Published: June 15, 2017 12:14 AM

खरिपाच्या पेरणीला प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : तालुक्याच्या काही भागात मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकांच्या पेरणीस प्रारंभ केला आहे. परंतु जिल्हा बँकेचे व्यवहार ठप्प असल्याने बियाणे व खतांच्या खरेदीसाठी पैशांची जुळवाजुळव करताना शेतकरी मात्र मेटाकुटीस आले असून, शासनाने नुकतेच खरिपासाठी शेतकऱ्यांना जाहीर केलेले १० हजार रु पये लवकर मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.बहुसंख्य शेतकरी हे जिल्हा बँकेचे खातेदार आहेत. त्यांचे सर्व आर्थिक व्यवहार या खात्यावर होत असतात. अनेक नियमित कर्जदार शेतकऱ्यांनी कर्ज माफ होण्याची वाट न पाहता सोसायटीकडून घेतलेल्या पीककर्जाचा भरणा जिल्हा बँकेत केला आहे. जिल्हा बँकेचे व्यवहार सध्या ठप्प असल्याने या शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळालेले नाही. नुकतीच शासनाने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केल्यामुळे ज्यांनी नियमित कर्जाचा भरणा केला असे कर्जदार शेतकरी पश्चात्ताप व्यक्त करीत आहेत. सन २००८ मध्ये केंद्र शासनाने शेतकऱ्यांना केलेल्या संपूर्ण कर्जमाफी योजनेत नियमित कर्जदार शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळाला नव्हता. यामुळे हे नियमित कर्जदार शेतकरी चिंतेत पडले आहेत.जिल्हा बँकेचे खातेदार असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरील उलाढाल ही थांबलेली आहे. खरीप हंगामात पीक लागवडीसाठी लागणारे बी, बियाणे व खते खरेदी करण्यासाठी या शेतकऱ्यांच्या जिल्हा बँकेतील खात्यावर पैसे असूनही बँकेतून पैसे मिळत नसल्यामुळे त्यांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे हे शेतकरी त्रस्त झाले आहेत. उधारीत बी-बियाणे मिळावे यासाठी बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांची मिनतवारी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. चालू खरीप हंगाम सुरळीत पार पडण्यासाठी शासनाने जाहीर केल्याप्रमाणे १० हजार रु पये पीककर्ज त्वरित उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.