शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

डाळींब लिलावास प्रारंभ

By admin | Published: July 19, 2016 12:33 AM

सटाणा : शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण

सटाणा : राज्य सरकारने शेतमाल अडतमुक्त करण्याचे धोरण जाहीर केल्याने त्याविरु द्ध व्यापाऱ्यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून बंद पुकारल्याने शेतकऱ्यांच्या शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी शासनाचा जो निर्णय होईल तो होईल तोपर्यंत शेतकऱ्यांना वेठीस न धरता खरेदी सुरू करावी, असे भाजपा-सेना युतीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना केलेल्या आवाहनाला सकरात्मक प्रतिसाद देत सोमवारपासून डाळींब खरेदीस सुरुवात केल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सोमवारी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, शहराध्यक्ष मुन्ना सोनवणे, व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बिंदूशेठ शर्मा, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरविंद सोनवणे, अ‍ॅड. वसंतराव सोनवणे यांनी येथील बाजार समितीचे प्रशासक चंद्रकात विघ्ने, सचिव भास्कर तांबे, व्यापारी महेश देवरे, संदीप देवरे, राजू खैरनार, बापू वाणी आदि व्यापार्यांची व माथाडी कामगारांची भेट घेऊन बैठक घेतली. या बैठकीत डॉ. विलास बच्छाव यांनी शेतकऱ्यांची आत्ताची आर्थिक स्थिती निदर्शनास आणून दिली. आधीच शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला आहे. आपला सर्वांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याची अत्यंत वाईट स्थिती झाली असल्याचे त्यांनी सांगितले. शासनस्तरावर जो काही निर्णय होईल तो आम्ही मान्यच करू परंतु कर्जाच्या खाईत लोटला जाणारा शेतकरीला होत देण्यासाठी लिलाव सुरू करावे असे आवाहन केले. त्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सोमवारी डाळिंबाचे लिलाव सुरु करण्याचा निर्णय घेऊन तत्काळ त्याची अंमलबजावणी करण्यात आली . आज सुमारे साडेतीन हजार क्र ेट डाळिंबाचा लिलाव झाला. शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. (वार्ताहर)