शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

अजूनही परिस्थिती जैसे थे प्रश्न

By admin | Published: August 06, 2016 12:48 AM

आरोग्याचा : तातडीने सफाई न झाल्यास साथीचे रोग बळावण्याची भीती

नाशिक : सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराला पुराचा मोठ्या प्रमाणात तडाखा बसला असून अजूनही शहरातील परिस्थिती पूर्वपदावर आलेली नाही. गुरुवारी (दि. ४) पावसाने विश्रांती घेतली असली तरी शुक्रवारी मात्र पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली. शहरातील पंचवटी, सराफ बाजार, भांडी बाजार, गोदापार्क या परिसराचे गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अजूनही व्यावसायिकांचे जीवन पूर्वपदावर न आल्याचे चित्र शुक्रवारी बघायला मिळाले.सराफ बाजारातील काही सराफांनी व्यवसायाला सुरुवात केली असली तरी दुकानांतील शोकेसमध्ये दागिने लावण्यात आलेले नाहीत, ग्राहकांचाही हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने छोट्या प्रमाणातच सराफ व्यावसायिक व्यवसाय करताना दिसत होते. अनेक सराफ दुकानांमध्ये अस्ताव्यस्त पडलेल्या फर्निचरची योग्य मांडणी सुरू होती तर काही दुकानांमध्ये पाण्याच्या साहाय्याने गाळ काढण्याचे काम शुक्रवारीही दिसत होते. दुकानदार आपल्या दुकानांमध्ये स्वच्छता करीत असले तरी दुकानातील गाळ तसेच साचलेला कचरा दुकाना बाहेर फेकत असल्याने या परिसराला उकिरड्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सराफ बाजारातील रस्ते अरूंद असल्याने याठिकाणी जेसीबी किंवा तत्सम उपकरणांच्या साहाय्याने स्वच्छता करणे शक्य होत नसल्याने व्यावसायिकच याठिकाणी स्वच्छता करत आहेत.सराफ बाजारापेक्षाही भांडीबाजार परिसराची वाईट अवस्था झाली असून अजूनही येथे गाळ तसाच साचला आहे. भांडी बाजारातील अनेक दुकानांमध्ये दुकानातील गाळ उपसण्याचे आणि दुकानातील भांडी स्वच्छ करण्याचे काम सुरूच आहे. या परिसरात कापड व्यावसायिकांची- देखील दुकाने असून पुराच्या पाण्यामुळे खराब झालेल्या कपड्यांचा खच दुकानांबाहेर पडल्याचे चित्र यावेळी बघायला मिळाले. पुराच्या पाण्यामुळे दुकानातील वस्तू खराब झाल्याने व्यावसायिकांकडून खराब झालेल्या वस्तूंची स्वस्तात विक्री सुरू असल्याने या वस्तूंची खरेदी करण्यासाठी नागरिकांची याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. श्रावण महिन्यात केल्या जाणाऱ्या पूजा तसेच पुढील महिन्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून पूजेसाठी लागणारी भांडी, इतर उपकरणे यासह चौरंगाची खरेदी करताना ग्राहक दिसत होते. भांडी बाजारात टपऱ्या वाहून आल्याने तसेच मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नागरिकांना अरूंद वाटेतून चालणे मुश्कील झाले आहे. पोटरीपर्यंत साचलेल्या गाळातून कशीबशी वाट काढताना नागरिक दिसत होते. याठिकाणीही प्लॅस्टिक, पुठ्ठे आदि कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याने परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. साथीचे रोग बळावण्याची शक्यता असल्याने स्वच्छता होणे आवश्यक असल्याचे मत व्यावसायिकांनी व्यक्त केले.