शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

थांब लक्ष्मी कुंकू लावते,

By admin | Published: September 26, 2015 11:16 PM

येवल्याच्या पैठणीचा अहेर करते!

बाईसाहबाला शिवीन म्हटलं चोळीपन शिंप्याची बंद झाली आळीमी काय चोळीसिवन्याजोगी नव्हती व्हई?एकनाथी भारुडातली ही बाईसाब म्हणजे नणंद. नणंद म्हटलं की अत्यंत खाष्ट आणि कजाग बाई. किती खाष्ट आणि किती भांडकुदळ, तर‘नंदेचं कार्ट किरकीर करतंयखरुज होऊ दे त्यालाभवानी आई रोडगा व्हाईन तुला’पण सगळ्या नणंदा अशा खाष्ट नसतात आणि भावजयादेखील एकनाथांनी वर्णिल्याप्रमाणे डांबीस आणि लबाड नसतात. काही नणंदा म्हणजे मूर्तीमंत ‘आनंद’ आणि भावजया तर साक्षात ‘देव्याच’. देव दिनाघरी धावला असं काहीसं भगवंत आणि सुदाम्याविषयी म्हणतात म्हणे. पण इथे तर साक्षात आनंदमूर्तीच देवीघरी धावली. तीदेखील बहुधा नणंदेच्या रुपात आणि तेही माहेरपणाला. माहेरपणाला आलेल्या माहेरवासणीला दोन दिवस थांबवून घेणं, तिला गोडाधडाचं खाऊ घालणं आणि तिची सासरी पाठविताना खण-नारळ, चोळी-बांगडी किंवा जे काही ऐपतीत बसेल आणि परवडेल ते देऊन तिचा आदर सत्कार करणं देवीस्वरुप भावजयीचं कर्तव्य ठरतं. सगळ्याच नणंदा आणि साऱ्याच भावजया एकनाथांना गवसल्या तशा नसतात.पण भावजयी देवीस्वरुप झाली म्हणून काय झालं? ऐपतही रग्गड असली म्हणून काय झालं? परवडण्या बिरवड्याण्याचा प्रश्न नसला म्हणून काय झालं? अखेर भावजयी पडली बाईमाणूस. तिची तर नणंद माहेरपणाला आलेली. पण तिच्या भावांची तर साक्षात जिवाभावाची बहीण माहेरपणाला आलेली. मग त्यांचे काही कर्तव्य आहे की नाही?त्यातून ते सारे म्हणजे काही,निस्ती कळण्याची भाकर अन आंबाड्याची भाजीखाणारे नव्हत!एकसे एक सारे तालेवार. कुणी शेतसारा वसूल करणारे, कुणी चोरा-चिलटांचा बंदोबस्त करणारे, कुणी ब्यँकांचा बंदोबस्त करणारे, तर कुणी काय अन कुणी काय. खरं तर त्यानी साऱ्यानी आपणहून पुढे व्हायचं. बहिणीला काय हवं काय नको हे विचारायचं. बाई तुला माहेरची ईरकल हवी, येवल्याची पैठणी हवी, सराफाकडचा एखादा डाग हवा का आणखी काय हवं, हे नुसतं विचारायचं नाही, तर आणून तिच्या ओच्यात ओटी म्हणून टाकायचं. पण कसचं काय आन फाटक्यात पाय. पण म्हणतात ना, गुराख्यानं सोडलं म्हणजे मालकाला सोडून चालत नाही. लाज देवीस्वरुप भावजयीलाच वाटली. नणंदेचा आदर सत्कार करु, तिची चांगली पाठवणी करु म्हणजे ती तिच्या सासरी जाऊन आपलं कौतीक करील आणि उद्या तिच्याकडंच जायचं वेळ आली तर एक पाट सात ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, असा भला विचार करुन भावजयीनी आपल्या साऱ्या दिरांना कामाला लावलं. एकेकाला एकेक जिन्नस नेमून दिला. खनपटी बसून तो त्यांच्याकडून आणवून घेतला. पण तरीही ‘जिथे जाऊ तिथे खाऊ’ म्हणणाऱ्या या बिलंदर भावांची कुरकर सुरुच. एकनाथांना जर हे समजलं असतं तर ते लगेच म्हणाले असते,नंदेची भाचरं कुरकुर करत्यातपटकी होऊं दे त्यानाआनंदीबाई पैठणी नेसवीन तुला