शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

चांदवड, सटाण्यात रास्ता रोको

By admin | Published: December 21, 2016 11:48 PM

कांदा गडगडला : शेतकरी संतप्त; वाहतूक ठप्प; प्रवाशांचे हाल

सटाणा/चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत्यांमध्ये   कांद्याचे भाव एकाच दिवशी तब्बल तीनशे ते साडेतीनशे रु पयांनी कोसळल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी अचानक रास्ता रोको करत विंचूर-प्रकाशा राज्यमार्ग तासभर रोखून धरला. अचानक झालेल्या या रास्ता रोकोमुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.  दुसरीकडे सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास चांदवड येथेही  संतप्त शेतकऱ्यांनी पेट्रोलपंप चौफुलीजवळ अचानक रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी शासनाविरुद्ध घोषणा दिल्या, तर रस्त्यावर ठाण मांडत दोन्ही बाजूंची वाहतूक अडविली.  बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा शेतमालाचे लिलाव सुरू झाले. सकाळी कांद्याला अवघा ३०० रुपये ते ६०० रुपये असा सरासरी भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पेट्रोलपंप चौफुलीवर जाण्याचा निर्णय घेतला. घटनेची माहिती मिळताच माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, कृउबाचे संचालक संजय जाधव, मजूर संस्थेचे संचालक शिवाजी कासव, समाधान जामदार, शांताराम घुले व शेतकरी चौफुलीवर आले. त्यांच्या पाठोपाठ चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन अहेर हेही रास्ता रोको आंदोलनात सामील झाले.  रास्ता रोकोचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक अनंत मोहिते, सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी व पोलीस कर्मचारी चौफुलीवर दाखल झाले. चांदवडचे तहसीलदार शरद मंडलिक हेही घटनास्थळी आले. त्यांना शेतकऱ्यांच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निवेदन दिले व येत्या आठ दिवसात सुधारणा करावी, अशी मागणी केली.  याप्रसंगी शेतकरी काही करून ऐकत नव्हते यावेळी माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चा इतकासुद्धा भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. याकडे राज्य व केंद्र शासनाने लक्ष देणे गरजेचे असताना शासन शेतकऱ्यांना सापत्नभावाची वागणूक देत असल्याचा आरोप करून गेल्या वेळी शेतकऱ्यांना एक रुपयाही भरपाई मिळाली नाही याकडे तातडीने येत्या आठ दिवसात लक्ष द्यावे, अशी मागणी कोतवाल यांनी केली. यावेळी कृउबाचे संचालक संजय जाधव, शिवाजी कासव, शेतकऱ्यांची भाषणे झाली, तर सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी, चांदवड तालुक्यामध्ये मुख्य पीक कांदा असून, मोठे उत्पादन झाले मात्र यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केंद्राकडे शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी चर्चा केली असून, आज दुपारपर्यंत निर्णय होईल, असे सांगितले. उपसभापती नितीन अहेर यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व कृषिमंत्र्यांची भेट घेऊन कांदाप्रश्नी गाऱ्हाणे मांडले. दरम्यान, संतप्त शेतकऱ्यांनी बाजार आवारांवर कांदा शेतमालाच्या आवकेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे गेल्या सप्ताहापासून दैनंदिन बाजारभावात घसरण होत आहे. शेतकरीवर्गास कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या खर्चाचा विचार करता बाजारपेठेत मिळणाऱ्या बाजारभावात कांदा विक्री करणे न परवडणारे आहे. कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झालेले असून, सदरचा कांदा काढणीनंतर लगेच विक्री करावा लागत असल्याने बाजार समितीच्या बाजार आवारावर मोठ्या प्रमाणावर आवकेत वाढ झालेली आहे. तसेच शेतकऱ्यांनी कांदा उत्पादनासाठी केलेला खर्च, सरकारी निमसरकारी संस्थांकडून व बॅँकांकडून घेतलेले कर्ज आणि त्याची परतफेड करणे त्यांना शक्य होणार नसल्याने येथील शेतकऱ्यांना आत्महत्त्येशिवाय पर्याय राहणार नाही तरी शासनाने कांदा बाजारभावात सुधारणा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावेळी झालेल्या रास्ता रोको आंदोलनात बापू शिंदे, राहुल कोतवाल, सचिन शिंदे, शांताराम घुले, सुभाष भांबर, नितीन थोरे, प्रभाकर ठाकरे, नंदकुमार कोतवाल, समाधान जामदार आदिंसह कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सटाण्यात मंगळवारी (दि. २०) कांद्याला सरासरी ८०० रु पये क्विंटल भाव मिळाला. मात्र आज झालेल्या कांद्याच्या लिलावात प्रतिक्विंटल तब्बल तीनशे ते साडेतीनशे रु पयांची घसरण झाली. त्यामुळे संतप्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दुपारी १ वाजेच्या सुमारास अचानक विंचूर-प्रकाशा राज्यमार्गावर कांद्याने भरलेली वाहने आडवी लावून रास्ता रोको आंदोलन सुरू केले. सटाणा बाजार समितीचे कांदा लिलाव मागील पंधरा दिवसांपासून विंचूर-प्रकाशा राज्यमार्गालगतच्या नवीन जागेवर स्थलांतरित करण्यात आले आहेत. तासभर सुरू राहिलेल्या या रास्ता रोको आंदोलनामुळे राज्यमार्गावर दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. नायब तहसीलदार आबासाहेब तांबे, पोलीस निरीक्षक बशीर शेख, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायवट आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेत शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन केले. (लोकमत ब्युरो)