शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

वादळाने पेठ तालुक्यात लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 00:38 IST

पेठ : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताउते या चक्रीवादळाने गुजरातकडे मार्गक्रमण करत असताना, किनारपट्टीलगत असलेल्या पेठ तालुक्याला मात्र चांगलेच झोडपून काढले. यामध्ये राहत्या घरांसह शासकीय इमारती व आंबा फळपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन कोरोना काळात अवकाळीचे संकट आल्याने आदिवासी शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहेत.

ठळक मुद्देकोरोनात अवकाळी : घरांसह आंबा पिकांचे पंचनामे करण्याची मागणी

पेठ : अरबी समुद्रात तयार झालेल्या ताउते या चक्रीवादळाने गुजरातकडे मार्गक्रमण करत असताना, किनारपट्टीलगत असलेल्या पेठ तालुक्याला मात्र चांगलेच झोडपून काढले. यामध्ये राहत्या घरांसह शासकीय इमारती व आंबा फळपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ऐन कोरोना काळात अवकाळीचे संकट आल्याने आदिवासी शेतकरी मात्र मेटाकुटीला आला आहेत.२०५ हेक्टर आंबा भुईसपाटपेठ तालुक्यात गत पाच दहा वर्षांपासून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून, शेतकरी केशर, हापूस, राजापुरी या अधिक उत्पादन देणाऱ्या आंबा फळांचे उत्पादन घेऊ लागले आहेत. याही वर्षी कोरोना व लॉकडाऊन यामुळे हाताला काम नसल्याने किमान आंब्याच्या विक्रीतून तरी घरखर्च भागविला जाईल, अशी आशा असताना ऐन पक्वतेत आलेला आंबा भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्गाचे प्रचंड नुकसान झाले आहे.तालुका कृषी विभागाच्या अहवालानुसार ९३ गावांतील १,४८० शेतकऱ्यांच्या २०५ हेक्टर क्षेत्रातील आंबा पिकाचे नुकसान झाले असून, तालुकास्तरीय यंत्रणेला पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे यांनी सांगितले.घरांसह शासकीय इमारतींची पडझडवादळामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये राहत्या घरांची पडझड झाल्याने कौले, लाकडे व संसारोपयोगी सामानाचे नुकसान झाले, तर हरणगाव, आसरबारी, आमडोंगरा, धुळघाट आदी गावांतील शाळा व शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. पावसाचे प्रमाण कमी असले, तरी प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे नुकसानीची तीव्रता अधिक जाणवली आहे. तालुक्यातील ६५ घरांचे वादळात अंशतः नुकसान झाल्याची माहिती तहसीलदार संदीप भोसले यांनी दिली. 

टॅग्स :talukaतालुकाgram panchayatग्राम पंचायत