शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंकडून मद्यप्राशन करून शिविगाळ, मराठा आंदोलकांचा आरोप, पुण्यात तणाव  
2
'दहशतवादाला कुठेही जागा नाही', युद्धाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींची नेतन्याहूंशी फोनवर चर्चा...
3
"उद्धव ठाकरेंनी आमच्यावर टीका करताना आरसा बघावा", देवेंद्र फडणवीस यांचा टोला
4
बंडखोरी, मुख्यमंत्रिपदावरील दावेदारीसह या ४ मुद्यांनी हरियाणात वाढवलंय भाजपा, काँग्रेसचं टेन्शन
5
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटणाऱ्यांवर काय कारवाई होणार? मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या...
6
"राहुल निरागस, स्वतःला फॅन्टम समजतात; त्यांनी...", हिमंता बिस्वा सरमांची बोचरी टीका
7
आता कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या ईडीच्या निशाण्यावर! MUDA घोटाळ्याप्रकरणी PMLA अंतर्गत FIR दाखल
8
राहुल गांधी ४,५ ऑक्टोबरला महाराष्ट्रात; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाचे करणार अनावरण
9
Akola: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हरवले आहेत, अकोल्यात कॉग्रेसचे अनोखे आंदोलन
10
"दम असेल तर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांविरोधात निवडणूक लढावी", फडणवीसांचे निकटवर्तीय जोशींचे आव्हान
11
इलेक्टोरल बाँड खंडणी प्रकरणात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना दिलासा, उच्च न्यायालयाकडून तपासाला स्थगिती
12
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे उमेदवार कसे निवडले जाणार? पक्षश्रेष्ठींनी ठरवला 'मास्टरप्लॅन'
13
विमान अपहरणानंतर वाटाघाटींसाठी गेलेल्या जसवंत सिंहांच्या लाल सुटकेसमध्ये काय होतं? २५ वर्षांनंतर मुलाने केला मोठा गौप्यस्फोट  
14
अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?
15
"हा 'पंढरी' कायम चालत राहील आणि...", पॅडी कांबळेची पोस्ट चर्चेत
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
17
अपक्ष निवडणूक लढवतेय देशातील सर्वात श्रीमंत महिला; मुलगा प्रचारापासून लांब तर सून मैदानात
18
नोकरी सोडून गेलेल्या कर्मचाऱ्याला Google ने परत बोलावले; पगार तब्बल 22,000 कोटी रुपये!
19
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
20
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?

केंद्र सरकार, भांडवलदारांविरोधात हा श्रमिकांचा लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 4:15 AM

नाशिक : नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्याऐवजी त्याची लूट होईल, त्याचप्रमाणे करार शेती कायद्यामुळे भांडवलदारांना ...

नाशिक : नवीन कृषी कायदे शेतकरीविरोधी असून, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळण्याऐवजी त्याची लूट होईल, त्याचप्रमाणे करार शेती कायद्यामुळे भांडवलदारांना अपेक्षित उत्पादन मिळू शकले नाही, तर शेतकऱ्यांच्या जमिनीही भांडवलदार कंपन्यांच्या घशात जातील, अशा तरतुदी केंद्र सरकारने भाजप, आरएसएस आणि अडाणी, अंबानी यांसारख्या भांडवलदारांच्या दबावातून केल्याचा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी केला आहे.

हे कारस्थान आता शेतकरी, श्रमिकांच्या लक्षात आले असून, आता ही लढाई केंद्र सरकारसह भांडवलदारांविरोधात या देशातील श्रमिक अशी झाली असून, या शेतकऱ्यांचाच विजय निश्चित असल्याचा विश्वास केरळचे खासदार के. के. रागेश यांनी व्यक्त केला.

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीकडे प्रस्थान करण्यासाठी नाशिकमध्ये जमलेल्या आंदोलकांना संबोधित करताना ते सोमवारी (दि.२३) बोलत होते. यावेळी त्यांनी आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, दिल्लीत पंजाब, हरयाणा, राजस्थान, मध्य प्रदेश , उत्तराखंडसारख्या वेगवेगळ्या राज्यांतील शेतकऱ्यांनी दिल्लीत जाणारे पाचही राष्ट्रीय महामार्ग रोखले आहेत. त्यांच्या आंदोलनाला नाशिकधून निघणारे राज्यभरातील शेतकरी बळ देतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दिल्लीतील हाडे गोठवणाऱ्या थंडीत शेतकरी रस्त्यावर बसले असून, आतापर्यंत या आंदोलनात ३६ शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. आणखी किती शेतकऱ्यांचे बळी घेणार, असा सवालही त्यांनी यावेळी केंद्र सरकारला केला. त्यांच्यासोबत माजी आमदार नरसय्या आडम, जे. पी. गावीत, सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डी. एल. कराड, किसान सभेचे राज्य अध्यक्ष किसान गुज्जर, सचिव अजित नवले, राजू देसले आदी विविध संघटनांच्या नेत्यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केले. दरम्यान,आंदोलकांच्या प्रतिनिधींनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत आंदोलनात सहभाग घेतला.

इन्फो- १

तीन हजार शेतकरी, कामगारांचा सहभाग

केंद्र सरकारने आणलेले नवीन तीन कृषी उत्पादन, व्यापार आणि करार शेतीसंदर्भातील कायदे हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला त्याचप्रमाणे केंद्राने कामगारांच्या विरोधातही चार कायदे आणल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळेच या आंदोलनात सुमारे तीन हजारहून अधिक शेतकरी व कामगारांनी सहभाग नोंदविल्याची माहिती समन्वयकांनी दिली.

इन्फो-२

काँग्रेससह विविध संघटनांचा पाठिंबा

राज्यभरातून नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानावर एकत्र येऊन दिल्लीकडे निघालेल्या शेतकरी मोर्चाला काँग्रेसच्या माजी आरोग्यमंत्री शोभा बच्छाव यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. त्याचप्रमाणे संगिनी महिला संघटनेच्या अनिता पगार, छावा क्रांतिवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे शशिकांत उन्हवणे, आपचे योगेश कापसे यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आंदोलकांना पाठिंबा दर्शविला.

इन्फो- ३

किसान जिंदाबादच्या घोषणा

दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी जमलेल्या विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनात वेगवेगळ्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनीही हल्लाबोलचा नारा देत सहभाग नोंदवला. आंदोलकांनी मोदी शासन होश मे आओ, मोदी शाह होश में आओ, हम अपना अधिकार मांगते, कोण बनाया हिंदुस्थान, इस देश के मजदूर किसान, काला कानून वापस लो, लढेंगे, जीतेंगे, किसान जिंदाबाद, इन्कालाब जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.

(फोटो-२१पीएचडीसी८०)

(फोटो-२१पीएचडीसी ९०) शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी दिल्लीच्या दिशेने निघालेल्या आंदोलकांना संबोधित करताना राज्यसभा खासदार के. के. रागेश.