शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सुनावणी आधीच बदलला राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेरील बोर्ड; नेमकं कारण काय?
2
माजी आमदाराला १०० ग्रॅम हेरॉईन विकताना पकडले; कारने पळताना भाच्याने पोलिसालाही उडविले
3
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना भुजबळांचं जोरदार शक्तीप्रदर्शन, हाती घेतला भाजपचा झेंडा; म्हणाले...
4
यशस्वी डाव! वॉशिंग्टनची 'सुंदर' गोलंदाजी; चेंडू कसा वळला ते रचिनसह टॉमलाही नाही कळलं (VIDEO)
5
सीएम ओमर अब्दुल्लांनी घेतली गृहमंत्री अमित शाहांची भेट, कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
6
एक आयडिया आणि आई-मुलाची जोडी ठरली सुपरहिट; वर्षाला करतात ५० लाखांची कमाई
7
अखेर ठरलं! अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा २'ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
8
Gold Silver Rates Today : सोन्या-चांदीच्या तेजीला ब्रेक, १४४२ रुपयांनी स्वस्त झाली चांदी; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
9
इथे ठाकरे गटाशी युती तोडली, तिथे संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज जरांगेंच्या भेटीला; चर्चांना उधाण
10
“आदित्य राजकारणात आले, त्याचा जास्त आनंद राज ठाकरेंना झाला”; मनसे नेत्यांनी सांगितली आठवण
11
"लढायचे नाही म्हणाले त्यांनाच उमेदवारी"; भांडूपमध्ये करेक्ट कार्यक्रम झाल्यानंतर मनसे नेत्याचा राजीनामा
12
Ratnagiri Assembly Elections 2024: मशाल पेटणार की, पुन्हा धनुष्यबाण! रत्नागिरीत गणित कसं?
13
आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!
14
संजय राऊत यांनी आमच्या मतदारसंघाचे तिकीट विकले; पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप 
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणातील आरोपीचं झिशान अख्तरशी कनेक्शन; कुटुंबीय म्हणतात...
16
Airtel ची कमाल, 'या' ३ प्लॅन्ससोबत देतेय ५ लाखांपर्यंतचा फ्री इन्शुरन्स; पाहा डिटेल्स
17
"या राज्यात एका जातीच्या बळावर...!", मनोज जरांगे यांचं मोठं विधान; असं जुळवणार राजकीय समीकरण
18
R Ashwin ची टॉप क्लास कामगिरी! नावे झाला WTC च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्सचा रेकॉर्ड
19
Kalyan: भाजप उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
20
दिवाळीत बँका किती दिवस बंद असणार? उसळलीय मोठी गर्दी, शेड्यूल बघून घ्या...

नांदगावी शेतकऱ्याची आत्महत्त्या

By admin | Published: January 04, 2017 12:25 AM

नांदगावी शेतकऱ्याची आत्महत्त्या

नाशिक : नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकरी आत्महत्त्येचे दुष्टचक्र नवीन वर्षातही कायम असून, नांदगाव तालुक्यातील तरुण शेतकऱ्याने नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतात गळफास घेऊन आत्महत्त्या केली आहे. शांताराम तानाजी बच्छाव (३५) रा. हिंगणदेहरे, ता. नांदगाव असे या शेतकऱ्याचे नाव असून, १ जानेवारी रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास कुटुंबातील व्यक्ती झोपेत असल्याचे पाहून त्यांनी शेतातच गळफास घेतला आहे. नापिकी, कर्जबाजारी-पणाबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोटाबंदीमुळे शेतमालाचे भाव कोसळल्याने बच्छाव यांनी आत्महत्त्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०१६ या संपूर्ण वर्षात जिल्ह्यात ८५ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या आहेत, तर २०१५ मध्येदेखील तितक्याच शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्त्या केल्या होत्या. शेतकरी आत्महत्त्येचे प्रमाण दोन्ही वर्षे कायम राहिल्याने प्रशासनही विचारात पडले आहे. गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्त्या पाहता शासनाने अनेक योजना जाहीर केल्या त्याचबरोबर प्रशासकीय पातळीवरही प्रयत्न करण्यात आले, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. साधारणत: महिन्याला सात ते आठ शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्या व विशेष म्हणजे निफाडसारख्या सधन तालुक्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्त्येचे प्रमाण अधिक आहे.