शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

बदली आरोग्य कर्मचारी देण्यावरून यंत्रणा हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 9:59 PM

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असतानाच दाखल होणारे रुग्ण व संशयित रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा कामी येत असून, ज्या कर्मचाऱ्यांना अशा रुग्णांच्या सुश्रूषेसाठी नेमण्यात आले आहे

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असतानाच दाखल होणारे रुग्ण व संशयित रुग्णांवर देखरेख ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची सेवा कामी येत असून, ज्या कर्मचाऱ्यांना अशा रुग्णांच्या सुश्रूषेसाठी नेमण्यात आले आहे त्यांना चौदा दिवसांनंतर क्वॉरंटाइन म्हणजेच विलगीकरण करण्याचे शासनाने आदेश आहेत. मात्र गेल्या दहा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी व अधिकाºयांची नेमणूक मालेगाव शहरात करण्यात आली असून, त्यांचा कार्यकाळ पूर्ण होत आल्याने त्यांच्याऐवजी बदली कर्मचारी कोण द्यायचे? असा प्रश्न यंत्रणेपुढे पडला आहे.कोरोनाचा संक्रमण कालावधी चौदा दिवसांचा असून, या काळातच रुग्णाला त्याचे लक्षणे दिसतात व त्याच काळात त्याच्यावर योग्य उपचार होणे जसे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे त्याच्यावर उपचार करणाºया वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांनीदेखील या चौदा दिवसांच्या काळात स्व:तच्या प्रकृतीची काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. चौदा दिवसांच्या कालावधीनंतर कोरोनाबाधित रुग्ण बरा होत असल्याचे आजवरच्या उदाहरणावरून स्पष्ट झाले असून, संशयित रुग्णांनादेखील चौदा दिवसच क्वॉरंटाइन ठेवण्यात येत आहे. त्यामुळे बाधित, संशयित रुग्णांबरोबरच त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर व कर्मचाºयांनादेखील चौदा दिवस क्वॉरंटाइन ठेवण्यात यावे, असे मार्गदर्शक सूचना आरोग्य विभागाने दिलेल्या आहेत.जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मालेगाव शहरात सापडत असून, तेथील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे पाहून जिल्हा परिषदेने लगतच्या तालुक्यातील सुमारे १४२ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाºयांची सेवा मालेगावी वर्ग करून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हातभार लावला आहे. आजच्या घडीला मालेगावी गेलेल्या या वैद्यकीय पथकामार्फत घरोघरी जाऊन गेल्या दहा दिवसांपासून आरोग्य सर्व्हे करीत आहेत. येत्या दोन, तीन दिवसांत या पथकाला क्वॉरंटाइन करावे लागणार आहे, मात्र या कर्मचाºयांच्या बदल्यात कोण? असा प्रश्न आता जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पडला आहे.-------------------------प्रश्न कायम : अतिरिक्त मनुष्यबळाची समस्यामुळात मालेगाव तालुक्यात लगतच्या तालुक्यातूनच जिल्हा परिषदेने आपले वैद्यकीय पथक मालेगाव शहरासाठी पाठविले होते. या पथकांच्या गैरहजेरीत अन्य तालुक्याचे कामकाज इतर अधिकाºयांच्या माध्यमातून पार पाडण्यात आले. परंतु आता पुन्हा नव्याने अधिकाºयांची तजवीज कोठून व कशी करणार? असा प्रश्न पडला आहे. मालेगाव शहरात काम करण्यास मुळातच वैद्यकीय पथक नाखूष असले तरी, सद्यपरिस्थिती पाहता मालेगाव शहरासाठी अतिरिक्तमनुष्यबळ कोठून व कसे उपलब्ध करायचे? असा प्रश्न उभा ठाकला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक