शहरं
Join us  
Trending Stories
1
युगान्त... रतन टाटा पंचत्वात विलीन; उद्योग विश्वातील युग संपले, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
2
अलविदा... रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देश भावुक; सोशल मीडियावरुनही श्रद्धांजली
3
विमानांत रतन टाटा यांच्या स्मृतींना उजाळा! गुंतवणूकदारांचा विश्वास कायम, शेअर्स वधारले
4
रतन टाटा यांचे कलाटणी देणारे धाडसी निर्णय; जेएलआरचे अधिग्रहण ते एअर इंडियाची घरवापसी
5
राज्यात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता; परतीच्या पावसाला अद्याप सुरुवात नाही
6
नॉन क्रिमिलेअरची मर्यादा १५ लाख करण्याची शिफारस; केंद्राला प्रस्ताव, VJNT, SBCचा समावेश
7
आणखी पाच समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे; प्रत्येकी ५० कोटींचे भाग भांडवल दिले जाणार
8
विजयादशमीचा मुहूर्त टळणार; मविआत पेच, विदर्भ, मुंबईतील जागांवरील तिढा कायम
9
‘एक देश, एक निवडणूक’ धोरण अमान्य; ‘या’ राज्याने विधानसभेत ठराव पारीत करत केला विरोध
10
‘ज्ञानराधा’ला ईडीचा दणका; १ हजार कोटींची मालमत्ता जप्त; मुंबई, बीड, जालना येथील संपत्ती
11
विशेष मोहीम राबवून राजकीय होर्डिंग्ज हटवा; उच्च न्यायालयाचे राज्यातील सर्व पालिकांना आदेश
12
धनगर ऐवजी धनगड वाचावे, शुद्धीपत्रक एका रात्रीत रद्द; संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
13
अक्षय शिंदेसाठी ‘ते’च वाहन का निवडले? पोलिस चकमकप्रकरणी सीआयडीचा पोलिसांना सवाल
14
चीनने आपल्या ताकदीचा वापर शांततेसाठी करावा: तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाइ चिंग-ते
15
Mumbai Rains: मुंबईला पावसाने झोडपलं; उपनगरांसह ठाण्यातही मुसळधार बरसला!
16
जातीय समीकरण आवश्यकच, मात्र हिंदुत्वापासून दूर जाऊ नका; संघाने टोचले भाजप पदाधिकाऱ्यांचे कान
17
एक मतदारसंघ अन् ३ तगडे नेते इच्छुक; माढ्याच्या मैदानात शरद पवार कोणता पैलवान उतरवणार?
18
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 2000 कोटी रुपयांचे कोकेन जप्त, आठवडाभरात दुसरी कारावई
19
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असणाऱ्या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात; ७ हजार गावांना होणार फायदा
20
हरयाणानंतर आता महाराष्ट्रातही भाजपला 'फ्रीबीज'चा फायदा होईल का?

नारंदी नदीत साकारलेला बंधारा भरला तुडुंब

By admin | Published: September 09, 2016 10:53 PM

नारंदी नदीत साकारलेला बंधारा भरला तुडुंब

येवला : दुष्काळामुळे बंधाऱ्याच्या कामाला खऱ्या अर्थाने गतीयेवला : पिंपळगाव जलालला नारंदी नदीवर नव्याने माती-दगड बंधारा साकारला आहे. शेतकऱ्यांनी लोकवर्गणीचा हातभार लावल्याने दोन - अडीच लाख रु पये खर्च करून व दराडे बंधूंनी स्वखर्चाने दिलेले जेसीबी यातून बंधारा पहिल्याच वर्षी तुडुंब भरला आहे. या पाण्याचे नुकतेच जलपूजन करण्यात आले. पिंपळगाव परिसरातील ग्रामस्थ व दराडे बंधूनी केलेल्या प्रयत्नामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीसिंचनासाठी याचा लाभ होणार आहे.अनेक वर्षातील ग्रामस्थांची मागणी मागील उन्हाळ्यात पूर्ण झाली आहे. उंदीरवाडी व पिंपळगाव जलाल शिवारात नारंदी नदीचे पाणी डोळ्यादेखत वाहून जात असल्याने पाणी संपले कि आजुबाजूच्या शेतकरयांना कोरडी नदी पाहवी लागत असे. वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी या शिवारात बंधारा करण्याची ग्रामस्थांची मागणी पूर्णत्वास जात नव्हती. मात्र दुष्काळामुळे बंधाऱ्याच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. यापूर्वी राजापूर, सायगाव येथील बंधारे दुरूस्ती व गाळ काढण्याचे काम जिल्हा बँकेचे अध्यक्ष नरेन्द्र दराडे व संचालक किशोर दराडे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने स्वताची पुंजी लावत पूर्ण केले. पिंपळगाव ग्रामस्थांनी दराडे यांच्याकडे नारंदी बंधार्याच्या कामाची मागणी केली. इंधनासह मोफत जेसीबी यंत्र उपलब्ध करून दिले गेले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक किशोर दराडे, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक संभाजी पवार, तालुकाप्रमुख झुझांर देशमुख, शहरप्रमुख राजेंद्र लोणारी, युवा नेते अमोल सोनवणे, बाबा डमाळे, सूर्यभान जगताप आदींच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. यावेळी शरद लहरे, ज्ञानेश्वर खोकले, सम्राट देशमुख, नारायण भोरकडे, अशोक भोरकडे, दत्तू भोरकडे, दिलीप भोरकडे, साखरचंद खुटे, पोपट वाघ, वसंत वाघ, सचिन देशमुख, संजय खुटे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)