शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
2
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
3
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
4
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
5
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
6
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
7
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
8
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
9
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
10
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
11
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
12
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
13
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
14
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
15
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
16
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
17
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
18
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
19
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
20
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली

दहशतवाद्यांना सोशल मीडियामुळे बळ

By admin | Published: January 31, 2015 12:54 AM

विजय भटकर : ईएसडीएस आयटी कंपनीच्या भेटीप्रसंगी प्रतिपादन; कायद्याची जरब बसविण्याची गरज

नाशिक : दहशतवादाला लगाम घालण्यासाठी जितके पर्याय समोर येत आहेत, तितक्याच दहशतवादाच्या वाटाही पसरत जात आहेत. त्यामध्ये सोशल मीडिया दहशतवाद्यांना बळ देणारे ठरत असून, या माध्यमातून भारतविरोधी कारवाया गतिमान करणे दहशतवाद्यांना सहज शक्य होत आहे. यावर जर नियंत्रण ठेवायचे असेल तर सोशल मीडियावर भारतीय पॉलिसी व कायद्यांची जरब बसविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन परम संगणकाचे जनक डॉ. विजय भटकर यांनी केले. सातपूर येथील ईएसडीएस आयटी कंपनीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष सोमानी, विशाल जोशी, नितीन कापडणीस, अविनाश राय, कोमल सोमानी, आशिष कुमार, हर्नाम सिंग आदि उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. भटकर म्हणाले की, फेसबुक, व्हॉट्स अ‍ॅपसारखी लोकप्रिय माध्यमे विदेशातून हाताळली जातात. त्यामुळे या माध्यमांवर सक्रिय असलेल्या भारतविरोधी शक्तीचा आपणास सहजासहजी विमोड करता येत नाही. शिवाय एकट्या फेसबुकवर ३५ ते ४० टक्के भारतीय यूजर्स असल्याने मोठ्या प्रमाणात भारतीय चलन परदेशात जात आहे. गार्डनर यांच्या सर्व्हेनुसार २०१४ मध्ये व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांचा महसूल विदेशात गेला असून, यामध्ये दरवर्षाला ३० टक्क्यांनी वाढ होत आहे, तर हीच माध्यमे भारतात असती तर कोट्यवधी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला असता. शिवाय भारतविरोधी दहशतवादी कारवायांवर रोख लावण्यातही आपल्याला यश आले असते. व्हॉट्स अ‍ॅप या माध्यमाचे संपूर्ण अधिकार १९ बिलीयन डॉलरला विकले गेले, ऐवढी रक्कम खर्च करण्याची भारतीयांमध्ये क्षमता आहे. मात्र इच्छाशक्ती नसल्याने सोशल मीडियांवरील वाढता दहशतवाद भारतासमोर आवाहन ठरत असल्याचेही डॉ. भटकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहा अडवानी यांनी केले.