शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
2
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
3
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
4
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
5
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
6
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
7
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
8
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग
9
नाशिकमध्ये महायुतीत बंडखोरी! समीर भुजबळ शिंदेंच्या उमेदवाराविरोधात मैदानात
10
भीषण! गाझातील शाळेवर इस्रायलचा हवाई हल्ला; ११ महिन्यांच्या बाळासह १७ जणांचा मृत्यू
11
पाकिस्तानचे स्वप्न भंगले! रशिया आणि चीनलाही भारतासमोर झुकावे लागले
12
डॉक्टर क्रिकेट सामना पाहत राहिले, उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू
13
आजच्याच दिवशी झाली होती राज्यातील राजकीय उलथापालथींना सुरुवात, पाच वर्षांत काय काय घडलं?
14
‘मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला’, माजी मॉडेलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सनसनाटी आरोप    
15
Amit Raj Thackeray Exclusive Interview: ...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरेंची पहिलीवहिली राजकीय मुलाखत
16
वडगाव शेरीत मोठा ट्विस्ट: महायुतीतील दोन्ही इच्छुकांना वरिष्ठांकडून शब्द, कोणाला मिळणार उमेदवारी?
17
विमानांना धमकी देणाऱ्यांवर कारवाईची तयारी, सरकारने META आणि 'एक्स'कडून डेटा मागवला
18
Amit Raj Thackeray Exclusive Interview: मी मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन- अमित ठाकरे
19
"अभिजीत बिचुकले स्वयंभू, जनतेनं आता..."; साताऱ्यात छत्रपती शिवेंद्रराजेंविरोधात लढणार
20
PAK vs ENG : फिरकीच्या तालावर पाहुण्यांना नाचवले; फायनल कसोटीतही पाकिस्तानच्या 'गब्बर'ची कमाल

नव्या औद्योगिक वसाहतीकडे उद्योजकांची पाठ

By admin | Published: November 21, 2015 11:41 PM

नाशिक शहरापेक्षा अधिक दर : दिंडोरी तालुक्यातील तळेगाव आक्राळे येथे जाण्यास गुंतवणूकदारांचा नकार

सातपूर : उद्योजकांनी नाशिकमध्ये गुंतवणूक करावी यासाठी राज्य शासनाने दिंडोरी तालुक्यातील तळेगाव अक्राळे येथे पाचशे एकर क्षेत्रावर औद्योगिक वसाहतीची तयारी केली खरी; परंतु गुंतवणूक वाढविण्यासाठी सवलती देण्याची व्यवहार्यचतुरता दर्शविली नाही. उलट नाशिक शहरातील सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीपेक्षा हे दर जास्त आहेत. परिणामी उद्योजकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे.गुजरातमध्ये कोणत्याही नव्या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी जमिनीचे स्पर्धात्मक दर दिले जात असताना ते दूरच उलट २३०० रुपये ते तीन हजार रुपयांचे दर जाहीर केल्यानंतर उद्योजकांनी मागणी करूनही दर मागे घेण्यात आलेले नाही. त्याचा फटका शासनाला बसला असून, ही जमीन आता वापराविना पडून आहे. राज्यात मुंबई-पुण्याजवळील झपाट्याने विकसित होणारे शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिकमध्ये गुंतवणूकदारांनी उद्योजक आणावेत, अशी अपेक्षा असली तरी सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीत जमीन उपलब्ध नाही. तसेच सिन्नरच्या सेझ प्रकल्पाचे भिजत घोंगडे असल्याने त्याला पर्याय दिंडोरी तालुक्यातील तळेगाव अक्राळे येथे आठशे एकर जमीन औद्योगिक वसाहतीसाठी अधिग्रहीत करण्यात आली आणि त्यापैकी पाचशे एकर क्षेत्रात प्लॉट पाडून भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात दीड ते सहा एकरचे सुमारे पन्नास भूखंड तयार करण्यात आले आहेत. तसेच मोठ्या उद्योगांना मागणीप्रमाणे जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यानंतर उरलेल्या भूखंडावर लघुउद्योजकांना संधी दिली जाणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने २९ जून रोजी भूखंड वाटपाचे दर निश्चित करून जाहीर केले. त्यानुसार पहिल्या सहा महिन्यांसाठी भूखंडाचा दर २३०० रुपये प्रतिचौरस मीटर असा असून त्यानंतर ३ हजार रुपये अशा दराने भूखंड विकले जाणार आहेत. परंतु महामंडळाचे दर अत्यंत जादा असून त्यामुळे उद्योजकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. नाशिक शहरापासून दिंडोरी तालुका हा गुजरात मार्गावर आहे. म्हणजेच मुंबई- आग्रा महामार्गाच्या थेट लगत नाही. त्यातच तळेगाव अक्राळे हे दिंडोरीच्या मध्यवर्तीही नाही अशा अनेक कारणांमुळे उद्योजकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. जून महिन्यात भूखंड खुले केल्यानंतर सहा महिने झाले तरी उद्योजक या वसाहतीचे नाव काढत नसल्याने नव्या वसाहतीची योजना फसली असून आता शासकीय दराबाबत फेरविचार करण्याची वेळ आली आहे. नाशिकमध्ये अतिरिक्त औद्योगिक वसाहत निर्माण व्हावी यासाठी पाठपुरावा करणाऱ्या औद्योगिक संघटनांपैकी निमाचे माजी अध्यक्ष रवि वर्मा यांनी सदरचे दर अवास्तव असल्याने ते कमी करावेत, अशी मागणी केली होती. परंतु त्यानंतर या विषयाकडे पुरेसा पाठपुरावा केला गेला नाही. परिणामी शासनाकडून हे दर कायम ठेवल्याने अजूनही त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.