शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

लेखनाचा प्रवास वास्तव, इतिहासाला धरून असावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2022 12:32 AM

नाशिक : मराठी वाचक खूप जागरूक आहे. लेखकाकडून झालेली एखादी चूक त्याच्या चटकन लक्षात येते. त्यामुळे ऐतिहासिक लेखन करताना लेखकाला वास्तव आणि इतिहास यातून प्रवास करावा लागतो. डोंबाऱ्याच्या खेळातील दोरीवरून कलाकार खाली पडू नये, आणि खेळही रंगात यावा, अशी ही कसरत असते, असे प्रतिपादन पानिपतकार विश्वास पाटील यांनी केले.

नाशिक : मराठी वाचक खूप जागरूक आहे. लेखकाकडून झालेली एखादी चूक त्याच्या चटकन लक्षात येते. त्यामुळे ऐतिहासिक लेखन करताना लेखकाला वास्तव आणि इतिहास यातून प्रवास करावा लागतो. डोंबाऱ्याच्या खेळातील दोरीवरून कलाकार खाली पडू नये, आणि खेळही रंगात यावा, अशी ही कसरत असते, असे प्रतिपादन पानिपतकार विश्वास पाटील यांनी केले.भगवान महावीर जन्मकल्याणक सोहळ्यानिमित्त श्री जैनसेवा कार्य समितीच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेत शुक्रवारी (दि. १५) परशुराम सायखेडकर नाट्यगृहात ते बोलत होते. ह्यमी आणि माझे लेखनह्ण विषयावर त्यांनी दुसरे पुष्प गुंफले. बेबीलाल संचेती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर प्रा. यशवंत पाटील, मोहनलाल ब्रह्मेचा, राजेंद्र कुमट, सोनल दगडी, संगीता बाफना आदी मान्यवर उपस्थित होते.पाटील म्हणाले, ह्यपानिपतह्ण माझ्यासाठी ह्यपुण्यपतह्ण ठरले. या कादंबरीला वाचकांनी डोक्यावर घेतले, अनेक भाषांमध्ये भाषांतर झाले. तसेच या कादंबरीमुळे ७० पुरस्कार आणि मानसन्मान मिळवून दिला. लेखनाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना पुस्तके वाचून घडलो. इयत्ता पाचवीत असताना भगवान महावीर, गौतम बुद्ध, सम्राट अशोक, महात्मा गांधी, साने गुरुजी वाचले. शिक्षकांचेही योग्य मार्गदर्शन लाभल्याने वाचनासोबतच लेखनाची आवड निर्माण झाली.इतिहास लेखनात सणावळ्या, तह असतातच, मात्र लेखकाने त्यातून माणुसकीचा झरा शोधायचा असतो. लेखक हा समाज, प्रदेश, भाषेला बांधील नसतो; तो माणुसकीचा कैवारी असायला हवा.ऐतिहासिक लेखक अनेकदा मनाचे किती आणि इतिहासाचे किती लिहिले जाते, अशी विचारणा करतात. त्यामुळे लेखकाला वास्तव आणि इतिहास यातून प्रवास करावा लागतो. पुराव्याच्या आधारे लेखन करावे लागते, असे पाटील यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गौतम सुराणा यांनी केले. सूत्रसंचालन पल्लवी कटारिया यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिक