शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN 1st Test : भारताची विजयी सलामी! अश्विनचा 'षटकार', जड्डूची साथ लाखमोलाची; बांगलादेशचा करेक्ट कार्यक्रम
2
पाकिस्तानी फवाद खानचा 'लिजेंड ऑफ मौला जट' सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही; राज ठाकरेंचा इशारा
3
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
4
पु्ण्याकडे येत होती ट्रेन, अचानक आला मोठा आवाज आणि रुळांवरून घसरलं इंजिन
5
'लाफ्टर शेफ' शोला लागली नजर? एकानंतर एक सेलिब्रिटींसोबत अपघात; राहुल वैद्यच्या चेहऱ्यावर...
6
IND vs BAN 4th Day Live : बांगलादेशने लय पकडली पण अश्विन-जडेजाने डोकेदुखी वाढवली; भारताची विजयाकडे वाटचाल
7
मोठा अनर्थ टळला! रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलिंडर; लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळला 
8
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
9
चीन समर्थक दिशानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत घेतली विजयी आघाडी   
10
ENG vs AUS : इंग्लंडचे पुनरागमन पण मिचेल स्टार्क भिडला! यजमानांचा पुन्हा पराभव; ऑस्ट्रेलियाची गाडी सुस्साट
11
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
12
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
13
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
14
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
15
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
16
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
18
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
19
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
20
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट

दिंडोरी तालुक्यातील धरणांची पातळी घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2022 6:15 PM

दिंडोरी/ लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच धरणांची पातळी सध्या घटली असून जवळजवळ एक महिन्यापासून करंजवण धरणाच्या पाण्याचे आवर्तन निफाड व येवला तालुक्यात सुरू असून सध्याच्या मितीला तालुक्यातील सर्वात मोठे असणाऱ्या करंजवण धरणामध्ये अवघा ३६ टक्के साठा राहिल्याने परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.

ठळक मुद्देमहिन्यापासून आवर्तन सुरू : पाणी बंद करण्याची स्थानिकांची मागणी

दिंडोरी/ लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील सर्वच धरणांची पातळी सध्या घटली असून जवळजवळ एक महिन्यापासून करंजवण धरणाच्या पाण्याचे आवर्तन निफाड व येवला तालुक्यात सुरू असून सध्याच्या मितीला तालुक्यातील सर्वात मोठे असणाऱ्या करंजवण धरणामध्ये अवघा ३६ टक्के साठा राहिल्याने परिसरातील शेतकरी वर्गात चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत.करंजवण धरणातून जवळपास एक महिन्यापासून पालखेड जलाशयात पाण्याचे आवर्तन चालू असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. तरी हे चालू असलेले पाणी आवर्तन त्वरित बंद करण्यात यावे अशी स्थानिक शेतकरी वर्गाने मागणी केली आहे. जर हे पाणी असेच चालू राहिले तर एप्रिल व मे महिन्यात दिंडोरी तालुक्यातील बळीराजांवर पाणीटंचाईची संक्रांत निर्माण होईल असे भाकीत व्यक्त केले जात आहे. पावसाळ्यात करंजवण धरण प्रथमच शंभर टक्के भरले होते. त्यामुळे परिसरातील बळीराजांवर आता पाणीटंचाईचे संकट कोसळणार नाही असे बोलले जात होते. परंतु सध्या गेल्या एक महिन्यापासून निफाड, येवला येथे हे पाण्याचे आवर्तन चालू असून धरणातील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे.यंदा दिंडोरी तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून जर धरणातील पाणी साठा कमी होत गेला तर तालुक्यातील नागरिकांना व शेतकरी वर्गाला मोठ्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल असे बोलले जात आहे. दरवर्षी उन्हाळ्यात करंजवण धरणांतून मोठ्या प्रमाणावर पालखेड धरणांत पाणी सोडण्यात येत असते. त्यामुळे प्रत्येक वर्षी ऐन उन्हाळ्यात कादवा नदीचे पात्र पाण्याविना उपाशी राहाते. परिणामी कादवा काठच्या गावांना नागरिकांना, जनावरांना, शेतकरी वर्गाला पाणीटंचाईचा धोका निर्माण होऊ शकतो. पाणी आवर्तन सोडतांना सलग असू नये. त्यामध्ये काही प्रमाणात अंतर असावे अशी ही मागणी जोर धरीत आहे.धरणांची पाणीसाठा टक्केवारी याप्रमाणे:१) पालखेड :- ६४ %२)ओझरखेड:- ५७%३)तिसगाव :-४८%४)करंजवण :-३६%५)पुणेगाव :-३५%६)वाघाड :-२४%

(१८ दिंडोरी डॅम)

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात