शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

महापालिकेची कासवगती, एनकॅपचा निधी खर्च करणार कधी?

By suyog.joshi | Updated: June 8, 2024 15:10 IST

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा अर्थात एनकॅप योजनेंतर्गत महापालिकेला मागील चार वर्षांत ८७ कोटींचा निधी दिला आहे...

 एनकॅपच्या निधीसाठी केंद्र सरकारने महापालिकेला जूनअखेर ४५ टक्के खर्च करणे बंधनकारक राहील, असा अल्टिमेटम दिला असून, शुक्रवारी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली होती, त्यात हा आदेश देण्यात आला. यावेळी महापालिका आयुक्त अशोक करंजकर, पर्यावरण उपायुक्त अजय निकत यांची प्रमुख उपस्थिती हाेती.केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वच्छ हवा अर्थात एनकॅप योजनेंतर्गत महापालिकेला मागील चार वर्षांत ८७ कोटींचा निधी दिला आहे. मात्र, सबंधित विभागांकडून त्यापैकी अवघा २३ कोटी ४२ लाख रुपये निधी खर्च झाला. याबाबत केंद्र सरकारने तीव्र नाराजी दर्शवली असून, चालू जून महिना अखरेपर्यंत एकूण निधीच्या ४५ टक्के रक्कम खर्च करावा, असा अल्टिमेटम दिला आहे. केंद्रांच्या पर्यावरण विभागाने प्रदूषण कमी करण्यासाठी स्वच्छ हवा कार्यक्रम अर्थात ‘एनकॅप’ योजना राबविली जात आहे. त्यामध्ये देशातील शंभर शहरांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये नाशिक शहराचा समावेश आहे. सन २०२० पासून या योजनेंतर्गत प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यासाठी महापालिकांना वर्षाला वीस कोटी रुपयांचा निधी दिला जातो. मनपाला मागील चार वर्षांत ८७ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला, परंतु एवढा मोठा निधी प्राप्त होऊनही मनपाकडून विविध योजनांसाठी कासवगतीने निधी खर्च केला जात आहे. मागील चार वर्षांत अवघा २३ कोटी ४२ लाखांचा निधी खर्च होऊ शकला. हे प्रमाण अवघे ३५ टक्के आहे. त्याची गंभीर दखल केंद्राने घेतली असून, जूनअखेरपर्यंत आणखी दहा टक्के निधी खर्च झाला पाहिजे, अशी तंबी दिली आहे.पाच कोटींची कपातकेंद्राकडून दरवर्षी वीस कोटी निधी दिला जातो. प्रदूषण कमी करण्यासाठी तो खर्च व्हावा, ही अपेक्षा असते. मात्र, हा निधी खर्च करण्यात मनपा अपयशी ठरल्याने चालू आर्थिक वर्षात केंद्राने पाच कोटींची कपात करून मनपाला जोरदार दणका दिला आहे.विभागांना निधी वर्गबांधकाम - ४२ कोटीयांत्रिकी - १५ कोटी ४६ लाखउद्यान - १२ कोटी २ लाखविद्युत - १४ कोटी ६३ लाखपर्यावरण - २ कोटीकेंद्र सरकारने व्हिसीद्वारे आढावा बैठक घेत निधी किती खर्च झाला, याची माहिती घेतली. जून अखेरपर्यंत एकूण निधीच्या ४५ टक्के खर्च झाला पाहिजे.- अजित निकत, उपायुक्त, पर्यावरण विभाग

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक