शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

'मोदी म्हणतात अभिनंदनला सोडवलं...मग कुलभूषणला का सोडवलं नाही?' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 16:09 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील तिथे भाषणात पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला, पायलट अभिनंदनला सोडवलं. मग कुलभूषण जाधव यांना का सोडवलं नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील तिथे भाषणात पुलवामा हल्ल्याचा बदला घेतला, पायलट अभिनंदनला सोडवलं. मग कुलभूषण जाधव यांना का सोडवलं नाही असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे. तसेच एअर स्ट्राईक लष्कराने केला अन् 56 इंच छाती कोण फुलवतंय तर मोदी अशी टीका पवारांनी मोदींवर केली. नाशिक येथील सय्यद पिंप्री येथे घेण्यात आलेल्या सभेत पवार बोलत होते. 

नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्या प्रचारार्थ आज शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत पवारांनी भाजपा आणि नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. यावेळी शरद पवार म्हणाले की, काश्मीर येथे कर्तव्य बजावताना पायलट निनाद मांडवगणे हॅलिकॉप्टर अपघातात शहीद झाले. देशासाठी प्राण दिले याचा आम्हाला अभिमान आहे. मात्र त्यांच्या कुटुंबियांनी सरकारला सांगावं की, शहीदांचा राजकीय फायदा तुम्ही घेऊ नका असं शरद पवारांनी सांगितले. 

राज्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणात माझ्यावर टीका करतात. माझ्या घराण्यात वाद सुरू आहे, पुतण्यानं पक्ष ताब्यात घेतला अशी टीका मोदींकडून माझ्यावर करण्यात येते. मात्र मोदींना कुटुंब नाही, मला कुटुंब आहे. त्यामुळे त्यांना कुटुंब नाही म्हणून उगाच कुठेही टिप्पणी करतात असा टोला शरद पवारांनी नरेंद्र मोदी यांना लगावला. त्याचसोबत नरेंद्र मोदींनी देशाची काळजी करावी, माझ्या कुटुंबाची करु नका असा चिमटाही पवारांनी काढला 

मोदी यांच्या भाषणातून गांधी घराणे आणि काँग्रेसवर टीका केली जाते. देशासाठी काँग्रेसने काहीच केलं नाही असा आरोप पंतप्रधान मोदी करतात याचा शरद पवारांनी समाचार घेतला. जवाहरलाल नेहरूंनी 11 वर्ष देशासाठी तुरुंगात घालवली, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी देशासाठी बलिदान दिलं आणि मोदी म्हणतात त्यांनी देशासाठी काहीच केलं नाही. नरेंद्र मोदींना सरकारच्या कामगिरीबद्दल सांगण्यासाठी काही नाही म्हणून गांधी घराण्यावर टीका करतात असा आरोप शरद पवारांनी केला. 

तसेच सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची अजिबात आस्था नाही. कांदा महागला तर 2 पैसे शेतकऱ्यांना मिळतात. मागच्या सरकारमध्ये कांदा महागला म्हणून भाजपानं आंदोलन केलं होतं. शेतकऱ्यांना पैसा मिळू नये ही या सरकारची मानसिकता आहे. म्हणून कांदा भाव पडताय. भावात संतुलन राखण्यात सरकार अपयशी ठरलंय असंही शरद पवारांनी सांगितले. 

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढ केल्याचा मोदी सरकारचा दावा खोटा आहे. गहू आणी तांदूळ दरात या सरकारनं अत्यल्प वाढ केली. सर्व शेतीमाल उत्पादनात मोदी सरकारनं आघाडी सरकारच्या तुलनेत अत्यल्प वाढ केली म्हणून शेतकरी आत्महत्या वाढल्या. उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना  घामाची किंमत मिळायला हवी. शेतकऱ्यांची सामूहिक शक्ती चमत्कार करू शकते असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९nashik-pcनाशिकSharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019